शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कहॉं हैं अच्छे दिन? अण्णा हजारे यांचा खोचक सवाल

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

पुणे : निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतक-यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतले जातील, असे जनतेला आश्वासन दिले, पण नऊ महिन्यात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एकप्रकारे मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे सरकारही कॉग्रेससारखेच असून, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कहॉं हैं अच्छे दिन? असा खोचक सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.

पुणे : निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतक-यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतले जातील, असे जनतेला आश्वासन दिले, पण नऊ महिन्यात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एकप्रकारे मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे सरकारही कॉग्रेससारखेच असून, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कहॉं हैं अच्छे दिन? असा खोचक सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे वाटले होते पण मोदी सरकारही याबाबत कॉंग्रेसचीच नक्कल करीत आहे, आम्ही जो लोकपालचा मसुदा तयार केला होता. त्यातील पाच ते सहा मुद्दे कॉंग्रेस सरकारने वगळले आणि या विधेयकाला संसदेत मंजूर केले. त्यावर राष्ट्रपतींची सही देखील झाली. पण कॉंग्रेसच्या काळातच काय तर गेल्या नऊ महिन्यात मोदी सरकारकडून ही त्याची अमंलबजावणी झालेली नाही. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना अपेक्षित असलेले लोकपाल आणण्याचे आश्वासन शपथविधी सोहळ्यात दिले आहे, त्याविषयी विचारले असता अरविंदला तसे लोकपाल आणण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले.
निवडणूकीदरम्यान शंभर दिवसात स्वीस बँंकेतील काळा पैसा भारतात आणू असे मोदींनी जाहिर केले होते, मग कुठे आहे तो पैसा? मोदी सरकारने केवळ मतांसाठी जनतेची दिशाभूल केली आहे. शेतक-यांविषयी मोठा कळवळा दाखविणा-या या सरकारने भूअधिग्रहण कायद्यामधील 70 ट्क्के शेतक-यांची जमिन देण्यासाठी मंजूरी असल्यास ती घेतली जाईल, ही तरतूदच रद्दबादल करून नवे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. उद्योजकांच्या हिताचा निर्णय घेऊन एकप्रकारे शेतक-यांचा विश्वासघातच केला आहे, त्यामुळे कहॉं हैं अच्छे दिन? अशी टिका त्यांनी केली. लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी, काळा पैसा आणि भूअधिग्रहण कायदा या मुद्यांवरच येत्या 24 फेबृवारीपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात कुणीही सहभागी होऊ शकेल. अगदी मुख्यमंत्री केजरीवालसुद्धा. मात्र पक्षाचा झेंडा, बँनर आणि व्यासपीठ याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------