शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कहॉं हैं अच्छे दिन? अण्णा हजारे यांचा खोचक सवाल

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

पुणे : निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतक-यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतले जातील, असे जनतेला आश्वासन दिले, पण नऊ महिन्यात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एकप्रकारे मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे सरकारही कॉग्रेससारखेच असून, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कहॉं हैं अच्छे दिन? असा खोचक सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.

पुणे : निवडणूकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकपाल विधेयकासह काळा पैसा भारतात आणण्यापासून शेतक-यांच्या हितासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतले जातील, असे जनतेला आश्वासन दिले, पण नऊ महिन्यात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. एकप्रकारे मोदी सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे हे सरकारही कॉग्रेससारखेच असून, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. कहॉं हैं अच्छे दिन? असा खोचक सवाल उपस्थित करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे वाटले होते पण मोदी सरकारही याबाबत कॉंग्रेसचीच नक्कल करीत आहे, आम्ही जो लोकपालचा मसुदा तयार केला होता. त्यातील पाच ते सहा मुद्दे कॉंग्रेस सरकारने वगळले आणि या विधेयकाला संसदेत मंजूर केले. त्यावर राष्ट्रपतींची सही देखील झाली. पण कॉंग्रेसच्या काळातच काय तर गेल्या नऊ महिन्यात मोदी सरकारकडून ही त्याची अमंलबजावणी झालेली नाही. काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अण्णांना अपेक्षित असलेले लोकपाल आणण्याचे आश्वासन शपथविधी सोहळ्यात दिले आहे, त्याविषयी विचारले असता अरविंदला तसे लोकपाल आणण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले.
निवडणूकीदरम्यान शंभर दिवसात स्वीस बँंकेतील काळा पैसा भारतात आणू असे मोदींनी जाहिर केले होते, मग कुठे आहे तो पैसा? मोदी सरकारने केवळ मतांसाठी जनतेची दिशाभूल केली आहे. शेतक-यांविषयी मोठा कळवळा दाखविणा-या या सरकारने भूअधिग्रहण कायद्यामधील 70 ट्क्के शेतक-यांची जमिन देण्यासाठी मंजूरी असल्यास ती घेतली जाईल, ही तरतूदच रद्दबादल करून नवे विधेयक संसदेत मंजूर करून घेतले. उद्योजकांच्या हिताचा निर्णय घेऊन एकप्रकारे शेतक-यांचा विश्वासघातच केला आहे, त्यामुळे कहॉं हैं अच्छे दिन? अशी टिका त्यांनी केली. लोकपाल विधेयकाची अंमलबजावणी, काळा पैसा आणि भूअधिग्रहण कायदा या मुद्यांवरच येत्या 24 फेबृवारीपासून दिल्लीमध्ये आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनात कुणीही सहभागी होऊ शकेल. अगदी मुख्यमंत्री केजरीवालसुद्धा. मात्र पक्षाचा झेंडा, बँनर आणि व्यासपीठ याचा उपयोग कोणालाही करता येणार नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------