शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मेहदी हसन यांचा मकबरा कधी बांधणार?

By admin | Updated: June 12, 2015 23:51 IST

विख्यात गझल सम्राट मेहदी हसन यांचे आप्तेष्ट मागील तीन वर्षांपासून त्यांचा मकबरा कधी बांधणार याची प्रतीक्षा करीत आहेत.

नवी दिल्ली : विख्यात गझल सम्राट मेहदी हसन यांचे आप्तेष्ट मागील तीन वर्षांपासून त्यांचा मकबरा कधी बांधणार याची प्रतीक्षा करीत आहेत. एवढेच नाही तर लाहोरमधून चोरीला गेलेल्या त्यांच्या अमूल्य ठेवींचा अद्याप थांगपत्ता नाही.शहेनशाह-ए-गझलचा शुक्रवारी तिसरा स्मृतिदिन होता; परंतु अनेकदा आश्वासन देऊनही कराचीत त्यांचा मकबरा बांधण्याचे काम अद्याप सुरूझालेले नाही. अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी लाहोरमधून त्यांचे संपूर्ण सामान चोरीला गेले. यात त्यांना मिळालेले पुरस्कार, सन्मान, मृत्यू प्रमाणपत्र, हार्मोनियम, गझलांची हस्तलिखिते आणि कपड्यांचा समावेश आहे. मेहदी हसन यांचे पुत्र आरिफ मेहदी यांनी कराचीतून वृत्तसंस्थेशी संवाद साधताना आपल्या कटू भावना व्यक्त केल्या. अब्बांना जाऊन तीन वर्षे झालीत; परंतु अजूनही त्यांच्या मकबऱ्याचे काम सुरू झालेले नाही. यासंदर्भात केंद्र, राज्य सरकार, गव्हर्नर सर्वांनी आम्हाला आश्वासन दिले; परंतु त्याची पूर्तता मात्र कुणी केली नाही,अशी खंत त्यांनी व्यक्तकेली. गझल सम्राटाच्या चोरीला गेलेल्या वस्तूंसाठी गेल्या तीन महिन्यांपासून आरिफ आणि त्यांच्या पत्नी पोलीस आणि नेत्यांकडे सतत घिरट्या घालत आहेत. आरिफ यांच्या पत्नी उमैमा आरिफ यांनी याप्रकरणी लाहोर उच्च न्यायालयात याचिकासुद्धा केली आहे. आरिफ यांनी मेहदी हसन यांचे संपूर्ण सामान कराचीतून लाहोरला आणले होते. येथे एका संग्रहालयात या सर्व स्मृती जतन करण्याची त्यांची मनीषा होती. लिटन रोडवर एका भाड्याच्या घरात त्यांनी या सर्व वस्तू ठेवल्या होत्या. तेथूनच त्या चोरीला गेल्या. आरिफ यांनी चोरीचा शोध लागावा यासाठी पंतप्रधानांपासून सर्वांकडे धाव घेतली; परंतु कुणीही त्यांची दखल घेतली नाही, असा त्यांचा आरोप आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)