शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

अग्निशमन विभाग सुसज्ज केव्हा होणार?

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही
नागपूर : विस्तारासोबतच शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे १५-२० वर्षापूर्वी जी यंत्रणा होती तीच आजही आहे. शहरात २०-२२ मीटर उंचीच्या इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणणारी यंत्रणा या विभागाकडे नाही. हा विभाग सुसज्ज केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापनावर दरवर्षी चर्चा होते. पावसाळा व उन्हाळ्याच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असल्याचा दावा केला जातो. परंतु अग्निशमन विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने उंच इमातीला आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१५ वर्षापूर्वी शहरात पाच अग्निशमन केंद्रे होती. विभागात ३०० कर्मचारी व अधिकारी होते. मागील काही वर्षात शहराचा विस्तार होऊ न लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. १० अग्निशमन केंद्रे झाली परंतु विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मात्र आजही तितकीच आहे.
शहरात हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश करण्यात आला आहे. मिहान सारखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. एम्प्रेस सिटी, आनंदम् यासारख्या टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. बैद्यनाथ चौकाच्या बाजूला भव्य मॉल्स व निवासी संकुल उभारले जात आहे. सोबतच शहरात ४५ ते ६० मीटर उंचीच्या इमारती उभ्या राहात आहेत. परंतु अशा इमारतीच्या वरच्या माळ्यावर आग लागल्यास ती आटोक्यात आणता येणारी टीटीएलसारखी यंत्रणा अग्निशमन विभागाकडे नाही. (प्रतिनिधी)
चौकट...
प्रस्ताव प्रलंबित
शहराचा होत असलेला विकास विचारात घेता अग्निशमन विभागाने टीटीएल यंत्र खरेदीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु मागील काही वर्षापासून तो प्रलंबित आहे. यावर पाच कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत दोनदा ग्लोबल निविदा काढण्यात आल्या. आता तिसऱ्यांना निविदा काढण्यात आली. पण पुढे काय हा प्रश्न कायम आहे.
चौकट...
२५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज
अग्निशमन विभागाला ५० अधिकारी व २०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. विभागाला वर्षाला पाच कोटी मिळतात परंतु याचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचे चित्र आहे.