शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

अग्निशमन विभाग सुसज्ज केव्हा होणार?

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही

शहराचा विकास : उंच इमारतीत आग लागल्यास नियंत्रण यंत्रणा नाही
नागपूर : विस्तारासोबतच शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. परंतु महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे १५-२० वर्षापूर्वी जी यंत्रणा होती तीच आजही आहे. शहरात २०-२२ मीटर उंचीच्या इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आणणारी यंत्रणा या विभागाकडे नाही. हा विभाग सुसज्ज केव्हा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापनावर दरवर्षी चर्चा होते. पावसाळा व उन्हाळ्याच्या दिवसात आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क असल्याचा दावा केला जातो. परंतु अग्निशमन विभागाकडे सक्षम यंत्रणा नसल्याने उंच इमातीला आग लागल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१५ वर्षापूर्वी शहरात पाच अग्निशमन केंद्रे होती. विभागात ३०० कर्मचारी व अधिकारी होते. मागील काही वर्षात शहराचा विस्तार होऊ न लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. १० अग्निशमन केंद्रे झाली परंतु विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या मात्र आजही तितकीच आहे.
शहरात हुडकेश्वर, नरसाळा भागाचा समावेश करण्यात आला आहे. मिहान सारखे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. एम्प्रेस सिटी, आनंदम् यासारख्या टोलेजंग इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. बैद्यनाथ चौकाच्या बाजूला भव्य मॉल्स व निवासी संकुल उभारले जात आहे. सोबतच शहरात ४५ ते ६० मीटर उंचीच्या इमारती उभ्या राहात आहेत. परंतु अशा इमारतीच्या वरच्या माळ्यावर आग लागल्यास ती आटोक्यात आणता येणारी टीटीएलसारखी यंत्रणा अग्निशमन विभागाकडे नाही. (प्रतिनिधी)
चौकट...
प्रस्ताव प्रलंबित
शहराचा होत असलेला विकास विचारात घेता अग्निशमन विभागाने टीटीएल यंत्र खरेदीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु मागील काही वर्षापासून तो प्रलंबित आहे. यावर पाच कोटीचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत दोनदा ग्लोबल निविदा काढण्यात आल्या. आता तिसऱ्यांना निविदा काढण्यात आली. पण पुढे काय हा प्रश्न कायम आहे.
चौकट...
२५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची गरज
अग्निशमन विभागाला ५० अधिकारी व २०० कर्मचाऱ्यांची गरज आहे. तसेच शहराचा विस्तार व लोकसंख्या विचारात घेता अत्याधुनिक यंत्रणेची गरज आहे. विभागाला वर्षाला पाच कोटी मिळतात परंतु याचा योग्य प्रकारे विनियोग होत नसल्याचे चित्र आहे.