शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
3
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
4
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
5
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
6
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
7
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
8
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
9
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
10
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
11
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
12
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
13
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
14
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
15
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
16
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
17
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
18
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
19
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
20
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा

‘जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणेच चांगले; हरयाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट

By राकेशजोशी | Updated: April 19, 2024 05:37 IST

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे.

राकेश जोशी, लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपने उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली असताना या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला रणांगणात दिसत नसल्याने ते राजकीय अज्ञातवासात आहेत की, पडद्यामागचे सूत्रधार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

इंडियन नॅशनल लोकदलपासून वेगळे होऊन स्थापन झालेला दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष राज्यातील सत्तेतून पायउतार होताच विस्कळीत झाला. पक्षाचे एकेक नेते पक्ष सोडत आहेत. हरयाणात भाजपसोबतची युती तोडल्यानंतर जेजेपीला ग्रहण लागल्याचे दिसत असताना दुष्यंत चौटालाही राजकारणातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

आयएनएलडीपासून फारकत घेऊन जेजेपीची स्थापना झाली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेजेपीने १० जागा जिंकत भाजपसोबत सरकार चालवले. दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री बनले. भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर जेजेपी पक्ष अक्षरश: मोडकळीस आला. त्यामुळे दुष्यंत चौटाला यांचे राजकीय अस्तित्व संपले का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मातोश्रींना मागावी लागली माफी

  • अल्पवयात राजकारणात आलेल्या दुष्यंत चौटाला यांना पक्षापासून रस्त्यापर्यंत संघर्ष करावा लागत आहे. सत्तेत असताना, नसताना ते टीकेचे धनी बनले. विशेषत: शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.
  • आंदोलनकर्त्यांचा रोष प्रचंड असल्याने त्यांना गाडीतून उतरावे लागले. अखेर त्यांच्या मातोश्री नैना चौटाला यांनी आंदोलनकर्त्यांची माफी मागावी लागली.
  • सत्तेत असताना स्थानिक युवकांना शासकीय नोकरीत आरक्षण दिल्याचे वचन त्यांनी पाळले नसल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. महिला कॉन्स्टेबल भरतीवेळीही त्यांच्यावर टीका झाली.

म्हणूनच हताश दुष्यंत म्हणतात...- जेजेपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपल्या पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. - अनेक नेते अन्य पक्षांत प्रवेश करत असल्याने निराश चौटाला यांना त्यांच्या एक्स हँडलवर लिहावे लागले की, जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा ते हरणेच चांगले.

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana lok sabha election 2024हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४