शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी- मद्रास हायकोर्ट

By admin | Updated: January 12, 2017 16:46 IST

मद्रास उच्च न्यायालयानं मुस्लिमांच्या तलाकवर महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 12 - मद्रास उच्च न्यायालयानं मुस्लिमांच्या तलाकवर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिमांच्या तलाकमध्ये काझींनी दिलेलं प्रमाणपत्र कायद्यानं वैध धरता येणार नाही, असं मद्रास उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयानं मिया बिवी राजी तो क्या करेगा काझी, याची आठवण झाली आहे.मुख्य न्यायाधीश एस. के. कौल आणि न्यायाधीश एमएम सुंद्रेश यांच्या खंडपीठानं सुनावणीदरम्यान हा निर्णय घेतला आहे. माजी आमदार बदर सैयद यांच्या जनहित याचिकेवर अंतरिम आदेश देताना न्यायालयानं हा निर्णय दिला. सैयद यांनी याचिकेत काझींनी दिलेल्या निर्णयाचा निषेध केला आहे. त्यांनी काझींनी दिलेल्या ट्रिपल तलाक आणि इतर कागदपत्रे ग्राह्य धरण्याच्या मंजुरीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयानं 1880 काझी अ‍ॅक्टवर ताशेरे ओढले असून, काझींचं पद मिळाल्यानं व्यक्तीला न्यायिक आणि प्रशासनिक अधिकार मिळत नाही, असं म्हटलं आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानंही काझींच्या अधिकारांना अवैध ठरवलं आहे. काझी फक्त शरिया कायद्यांतर्गत निर्णय देऊ शकत असल्याचं म्हटलं आहे. सैयद यांनी समर्थनार्थ त्यांनी मुस्लिम पर्सनल लॉ(शरिया) अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्ट 1937चा हवाला दिला आहे. न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी 21 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.