शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

दहशतवादी बु-हानला मारण्याची काय गरज होती ? लोकसभेत PDPचा सरकारला सवाल

By admin | Updated: July 21, 2016 08:18 IST

जम्मू काश्मीरमधील भाजपाचा मित्रपक्ष पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल विचारला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 21 - जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन लोकसभेत विरोधक सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडताना दिसत नाही आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बु-हान वनी मारला गेल्यानंतर केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे. आंदोलन शमवण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत असल्याचा दावा करत केंद्र सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. 
 
विशेष म्हणजे जम्मू काश्मीरमधील भाजपाचा मित्रपक्ष पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) बु-हान वनीच्या हत्येवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत हत्या करण्याची काय गरज होती ? असा उलट सवाल विचारला आहे. बु-हान वनी जर गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही ? असा सवाल पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी उपस्थित केला. सरकारने लष्करी अधिकाराऐवजी नैतिक अधिकाराचा वापर करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 
 
बु-हान वनीच्या हत्येच्या निषेधार्थ पाकिस्तानने काळा दिवस जाहीर केल्याने परिस्थिती अजून बिघडली असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. मात्र आपल्या देशातील दहशतवादाला मुळासकट संपवण्यासाठी पाकिस्तान कोणतेही प्रयत्न करत नसल्याचंही सांगण्यात आलं. काश्मीरमधील लढाई भौगोलिक नसून वैचारिक असल्याचं  परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम जे अकबर यांनी म्हटलं आहे. 
 
 
काँग्रेस नेते ज्योतीरादित्य सिंधिया यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 2 आठवड्यात आपल्या नव्या केंद्रीय मंत्र्यांना शुभेच्छा देण्यास, पॅरिस हल्ल्यावर दुख: व्यक्त करण्यास वेळ मिळाला, मात्र काश्मीरमधील घटनेवर एक शब्दही काढला नसल्याचं म्हटलं आहे. अफ्रिका दौ-यावरुन परतल्यावर नरेंद्र मोदींनी उच्चस्तरीय बैठक बोलावली मात्र त्यामध्ये जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री उपस्थित नव्हत्या असंही ज्योतीरादित्य सिंधिया यांनी सांगितलं आहे.
 
एम जे अकबर यांनी चर्चेला दहशतवादाविरोधात भारताची लढाई असं स्वरुप देण्याचं आवाहन यावेळी केलं. भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.