शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

सगळंच मी करायचं मग बाकीचे काय करणार? विराटचा सवाल

By admin | Updated: February 2, 2017 14:30 IST

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारताने बाजी मारली तरी, विराट कोहलीला या मालिकेत काही कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे काल सामना संपल्यानंतर विराटला

ऑनलाइन लोकमत 
बंगळुरू, दि. 2 -   भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारताने बाजी मारली तरी, विराट कोहलीला या मालिकेत काही कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे काल सामना संपल्यानंतर विराटला प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांचा भडिमार सहन करावा लागला.  यावेळी विराटने असे काही उत्तर दिले की ऐकणारे गप्प झाले. 
प्रश्नांचा भडिमार झाल्यावर विराट म्हणाला, "मी आयपीएलमध्ये सलामीला येऊन फलंदाजी केली होती. त्यावेळी मी चार शतके देखील फटकावली. तेव्हा कुणी काहीच बोलले नाही, आता एक दोन सामन्यात धावा झाल्या नाहीत तर अडचण झाली का? संघात अन्य दहा खेळाडूदेखील आहेत. त्यांच्याकडेही लक्ष द्या. सगळे काही मीच केले तर बाकीचे काय करणार?"
"मी दोन्ही सामन्यात 70 धावा फटकावल्या असत्या तर तुम्ही आज माझ्यावर प्रश्वांची सरबत्ती केली असती का? बरोबर बोलत आहे ना मी. मग आता मालिकाविजयाचा आनंद लुटा," असा टोलाही विराटने हाणला.