शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

गुजरात देशात नाही काय?

By admin | Updated: February 2, 2016 02:57 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आणि गुजरातसारखे राज्य संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आणि गुजरातसारखे राज्य संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी का करीत नाहीत, असा सवाल केला.संसद काय करीत आहे, गुजरात भारताचा हिस्सा नाही काय, हा कायदा संपूर्ण भारतासाठी असताना गुजरातमध्ये तो अद्याप लागू का करण्यात आला नाही? उद्या कुणी असेही म्हणेल की आम्ही फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि पुरावा कायदा अमलात आणणार नाही, अशा अत्यंत कडक शब्दात न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या नेतृत्वातील पीठाने ताशेरे ओढले. सोबतच केंद्र सरकारला दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मनरेगा,अन्न सुरक्षा आणि मध्यान्ह भोजनसारख्या कल्याणकारी योजनांच्या स्थितीबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देशही दिले.केंद्र सरकारला येत्या १० फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायचे असून त्यानंतर दोन दिवसांनी पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १८ जानेवारीला केंद्र सरकारला मनरेगा, अन्नसुरक्षा, मध्यान्ह भोजन योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात माहिती देण्यास सांगितले होते. दुष्काळग्रस्त भागातील लोकांना किमान आवश्यक रोजगार आणि भोजन उपलब्ध होत आहे की नाही, हे न्यायालयाला जाणून घ्यायचे होते. स्वराज अभियानच्या मागण्यादुष्काळग्रस्तांना डाळ, खाद्यतेलही देण्यात यावे. शाळकरी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दूध आणि अंडीही मिळावीत. पीक नुकसानीची वेळीच आणि योग्य नुकसानभरपाई दिली जावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता सबसिडी आणि जनावरांसाठी सवलतीच्या दरात चारा मिळावा. (लोकमत न्यूज नेटवर्क)> सर्वोच्च न्यायालय एका जनहित याचिकेवर सुनावणी करीत आहे. उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड, बिहार, हरियाणा आणि चंदीगड या राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ असताना तेथील अधिकारी मात्र योग्य मदत पुरवीत नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. > ‘स्वराज अभियान’ नावाच्या स्वयंसेवी संघटनेने ही याचिका केली असून योगेंद्र यादव त्याचे नेते आहेत. अन्नसुरक्षा योजना लागू करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला पाच किलो धान्याची हमी देण्यात आली आहे.