शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात देशात नाही काय?

By admin | Updated: February 2, 2016 02:57 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आणि गुजरातसारखे राज्य संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा लागू न करणाऱ्या राज्यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आणि गुजरातसारखे राज्य संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी का करीत नाहीत, असा सवाल केला.संसद काय करीत आहे, गुजरात भारताचा हिस्सा नाही काय, हा कायदा संपूर्ण भारतासाठी असताना गुजरातमध्ये तो अद्याप लागू का करण्यात आला नाही? उद्या कुणी असेही म्हणेल की आम्ही फौजदारी दंड संहिता, भारतीय दंड संहिता आणि पुरावा कायदा अमलात आणणार नाही, अशा अत्यंत कडक शब्दात न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या नेतृत्वातील पीठाने ताशेरे ओढले. सोबतच केंद्र सरकारला दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मनरेगा,अन्न सुरक्षा आणि मध्यान्ह भोजनसारख्या कल्याणकारी योजनांच्या स्थितीबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देशही दिले.केंद्र सरकारला येत्या १० फेब्रुवारीपर्यंत यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करायचे असून त्यानंतर दोन दिवसांनी पुढील सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १८ जानेवारीला केंद्र सरकारला मनरेगा, अन्नसुरक्षा, मध्यान्ह भोजन योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात माहिती देण्यास सांगितले होते. दुष्काळग्रस्त भागातील लोकांना किमान आवश्यक रोजगार आणि भोजन उपलब्ध होत आहे की नाही, हे न्यायालयाला जाणून घ्यायचे होते. स्वराज अभियानच्या मागण्यादुष्काळग्रस्तांना डाळ, खाद्यतेलही देण्यात यावे. शाळकरी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत दूध आणि अंडीही मिळावीत. पीक नुकसानीची वेळीच आणि योग्य नुकसानभरपाई दिली जावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरिता सबसिडी आणि जनावरांसाठी सवलतीच्या दरात चारा मिळावा. (लोकमत न्यूज नेटवर्क)> सर्वोच्च न्यायालय एका जनहित याचिकेवर सुनावणी करीत आहे. उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, झारखंड, बिहार, हरियाणा आणि चंदीगड या राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ असताना तेथील अधिकारी मात्र योग्य मदत पुरवीत नसल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. > ‘स्वराज अभियान’ नावाच्या स्वयंसेवी संघटनेने ही याचिका केली असून योगेंद्र यादव त्याचे नेते आहेत. अन्नसुरक्षा योजना लागू करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला पाच किलो धान्याची हमी देण्यात आली आहे.