शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

न्यायपालिकेला टाळे लावायचे काय?

By admin | Updated: October 29, 2016 01:51 IST

उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या रखडवून सरकार न्यायप्रणाली ठप्प पाडू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला फटकारले.

नवी दिल्ली : उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या रखडवून सरकार न्यायप्रणाली ठप्प पाडू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला फटकारले. कॉलेजियमने खूप आधी शिफारशी करूनही न्यायमूर्तींच्या नियुक्त्या न केल्यामुळे संतप्त पीठाने अशाने न्यायालये बंद पडून न्याय कुलूपबंद होईल, असे खडे बोलही सुनावले. ‘तुम्ही संपूर्ण प्रणाली बंद पाडू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या नावाविषयी समस्या असेल तर ते नाव फेरविचारासाठी आमच्याकडे परत पाठवा, असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने केंद्राचे प्रतिनिधी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना सुनावले. उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांना होत असलेल्या विलंबाबाबत संताप व्यक्त करताना पीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचे उदाहरण दिले. न्यायमूर्तींअभावी तेथील न्यायदान कक्षांच्या एका संपूर्ण मजल्याला कुलूप ठोकावे लागले आहे. तुम्हाला कदाचित सर्व ठिकाणचे न्यायदान कक्ष बंद पाडून न्याय कुलूपबंद करायचे दिसत आहे, असे न्या. डी. वाय. चंद्रचुड आणि न्या. एस. नागेश्वर राव यांचा समावेश असलेल्या पीठाने सुनावले. न्यायमूर्ती नियुक्त्या रखडण्यामागे ‘मेमोरेंडम आॅफ प्रोसिजर’ला (एमओपी) अंतिम रूप न दिले जाणे हे एक कारण असल्याचे रोहतगी यांनी सांगितल्यानंतर न्यायालयाचा पारा चढला. या कारणास्तव नियुक्त्या थांबविल्या जाणार नाहीत. प्रसंगी जुन्या एमओपीच्या आधारे नियुक्त्या करता येऊ शकतील, असे विधी मंत्रालयाने मान्य केले आहे. त्यामुळे तुम्ही नव्या एमओपीशिवाय न्यायमूर्तींची प्रक्रिया पूर्ण करण्यास बांधील आहात’, असे न्यायालयाने ऐकवले. कॉलेजियमने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्ती पदांसाठी शिफारस केलेल्या ७७ नावांपैकी केवळ १८ नावांवर आतापर्यंत शिक्कामोर्तब झाले आहे. तुम्हाला नावे देऊन नऊ महिने उलटले. तुम्ही ही नावे बुडाखाली ठेवली आहेत. तुम्ही कशाची प्रतिक्षा करीत आहात? तुम्हाला व्यवस्थेत काही बदल हवा आहे की व्यवस्थेत क्रांती अपेक्षित आहे, असा खोचक सवाल करताना सरकार नियुक्त्या रोखू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कार्यकारींच्या निष्क्रियतेने संस्था नाश पावते, असे निरीक्षण पीठाने नोंदविले. या प्रकरणाची सुनावणी ११ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकली. तुम्ही ‘त्यांना’ बोलवा...अलाहाबाद उच्च न्यायालयासाठी कॉलेजियमने १८ नावांची शिफारस केली. सरकारने त्यातील आठ नावे निवडली आणि आता ते केवळ दोन जणांची नियुक्ती करू इच्छिते. आम्ही गेल्या ४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील फाईल पाठविली. त्याबाबत काय प्रगती झाली ते आम्हाला सांगा. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि विधी व न्याय मंत्रालयांच्या सचिवांना पाचारण करू शकतो. तुम्ही त्यांना बोलवा. मला त्यांचे म्हणणे ऐकायचे आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. तथापि, निकालाच्या आदेशात त्यांनी हा मुद्दा समाविष्ट केला नाही.