शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

लोकशाहीसाठी चांगले काय, ते संसदेने ठरवावे न्यायालयाच्या सक्रियतेवर भाष्य : सुप्रीम कोर्टाने आखली लक्ष्मणरेषा

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

नवी दिल्ली : लोकशाहीला वाचविण्यासाठी चांगले काय आहे, त्यासंबंधी निर्णय संसदेवर सोडण्यात आला असल्याचे सांगत सवार्ेच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. न्यायालय

नवी दिल्ली : लोकशाहीला वाचविण्यासाठी चांगले काय आहे, त्यासंबंधी निर्णय संसदेवर सोडण्यात आला असल्याचे सांगत सवार्ेच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. न्यायालय
विधिपालिकेच्या क्षेत्रात पाऊल टाकू शकत नाही. निवडून आलेले सदस्य किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मंत्री न बनविण्याबाबत निर्णय संसदेला घ्यायचा आहे, असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.
न्यायालयीन सक्रियतेच्या नावावर आम्ही विधिपालिकेच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे आहे काय, लक्ष्मणरेषा घालून देण्यात आली आहे, आम्ही ती ओलांडू शकतो काय? अधिकारांची विभागणी झाली आहे. उपरोक्त मुद्यावर लोकप्रतिनिधींना निर्णय घ्यायचा आहे. आता त्यांनी विधी आयोगाची शिफारस केली आहे. देश कसा चालवायचा हे त्यांना कळते. कोणत्या प्रकारचे लोक असायला हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करीत नाही, असेही न्या. दत्तू, ए.के.सिक्री आणि ए.के.मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले.
लोकशाही वाचविण्यासाठी संसद सदस्य कोणत्या प्रकारचे लोक हवेत ते ठरवू शकतात. चांगले प्रशासन हा आमचा नव्हे तर त्यांचा निर्णय आहे. केवळ आरोप निश्चित झाले म्हणून एखाद्याला निवडणुकीत सहभागापासून रोखण्यात आल्यास त्याच्यावर कायमचा कलंक लागला जाऊ शकतो, याबाबत खंडपीठाने सावधगिरीचा इशाराही दिला.
-------------------
न्यायालयाच्या मर्यादा अधोरेखित
गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये अशी विनंती एका जनहित याचिकेत करण्यात आली होती. याचिकाकर्त्याची अस्वस्थता आम्ही समजू शकतो मात्र केवळ आरोप निश्चित झाल्याच्या आधारावर आम्ही एखाद्याला अपात्र ठरवू शकत नाही किंवा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याला अटकाव घालू शकत नाही. एखाद्याला दोषी ठरविले जात नाही तोपर्यंत त्याला निरपराध मानले जाते. आरोप असलेल्यांना निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखले जावे काय? प्रथमदर्शनी ते भावणारे असले तरी वैधानिक तरतुदी किंवा घटना तसे करण्याला मंजुरी देत नाही. एखाद्याचा दोष सिद्ध होईपर्यंत तो निरपराध असतो त्यामुळे तोपर्यंत तो पूर्वग्रहच मानला जातो. निवडणुकीसंबंधी विविध मुद्यांबाबत कायदे पाहता आम्ही मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याच्या स्थितीत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.