शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा ? सर्वोच्च न्यायालयाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2016 15:52 IST

सिगारेटची पाकिटे रंगहीन करण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा आहे ? अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. सिगारेटची पाकिटे रंगहीन करण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे. 
 
अलाहाबादमधील वकील उमेश शर्मा यांनी ही याचिका केली आहे. सिगारेटची पाकिटे रंगहीन केल्याने त्याचा आकर्षकपणा कमी होईल, त्यामुळे त्यावर देण्यात येणा-या धोक्याच्या सूचनेकडे लक्ष जाईल असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. स्मोकिंगमुळे कॅन्सर होतो याचा काय पुरावा आहे ? जे अजिबात धुम्रपान करत नाहीत त्यांना कॅन्सर झाल्याच्या घटना आहेत तर दुसरीकडे धुम्रपान करुन देखील अनेक वर्ष जगणारी लोकदेखील आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी केंद्राकडून उत्तरदेखील मागवलं आहे. 
 
याचिकाकर्ते उमेश शर्मा यांना गुटखा आणि धुम्रपानाचं व्यसन आहे. ते सध्या जीभ आणि तोंडाच्या कॅन्सरने ग्रस्त आहेत. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 2020 पर्यंत 1.5 दशलक्ष लोकांचा तंबाखू आणि धुमप्रानाच्या व्यसनामुळे मृत्यू होणार असल्याची माहिती सर्वेक्षणात समोर आल्याचं उमेश शर्मा यांनी सांगितलं आहे. 
सध्या तंबाखू उत्पादने आकर्षक पद्धतीने पॅकिंग केली जातात जेणेकरुन तरुणांनी त्यांची खरेदी करावी आणि सेवन करावं. यामुळे पाकिटावर दिलेल्या धोक्याच्या सुचनेकडे लक्ष जात नाही. यामुळे तंबाखू उत्पादन करणा-या कंपन्यांना रंगहीन पाकिटे तयार करण्यास सांगण्याची गरज आहे. ज्यावर ब्रॅण्ड कलर, लोगो, ग्राफिक्स नसावेत. रंगहीन पाकिटे असावीत ज्यावर चित्राच्या माध्यमातून किंवा लिखीत धोक्याची सूचना दिली असावी जेणेकरुन लोकांचं त्याकडे लक्ष जाईल आणि त्यांची खरेदी करण्यापासून ते स्वताला रोखतील असं मत उमेश शर्मा यांनी व्यक्त केलं आहे. 
 
भारतात तंबाखूचा मुलं आणि तरुणांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. जागतिक प्रौढ तंबाखू सर्वेक्षण अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतात 15 ते वरील वयोगटामधील 35 टक्के म्हणजे 28 करोड लोक तंबाखूचं सेवन करत असल्याची माहिती मिळाली आहे. आणि यातील अनेकजण साक्षर आणि निम-साक्षर आहेत. तंबाखूमुळे होणा-या आजारांवरील उपचारांसाठी 2011मध्ये  104,500 कोटी खर्च करण्यात आला आहे. जो आपल्याचा जीडीपीच्या 1.16% आहे अशी माहिती उमेश शर्मा यांनी दिली आहे. 
प्रभात झा यांनी एका मासिकात लिहिलेल्या अहवालानुसार गेल्या 17 वर्षात विडी-सिगारेट ओढणा-या भारतातल्या पुरुषांची संख्या 36 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली आहे. एका पाहणीत आढळलेल्या माहितीनुसार 1998 मध्ये विडी-सिगारेट ओढणा-या पुरुषांची (15 ते 69 वयोगट) संख्या7.9 कोटी होती, जी 2015 पर्यंत 2.9 कोटींनी म्हणजेच 36 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली आहे. याचा अर्थ भारतामध्ये दरवर्षी स्मोकर्समध्ये सरासरी 17 लाख पुरुषांची भर पडत आहे.2010 मध्ये देशात झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 10 टक्के किंवा 10 लाख मृत्यू धुम्रपानामुळे झाले होते. यापैकी 70 टक्के मृत्यू 30 ते 69 या वयोगटातील होते.