शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते? एकनाथ खडसेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

By admin | Updated: December 30, 2014 00:10 IST

रघुराम राजन यांची केली पाठराखण

रघुराम राजन यांची केली पाठराखणनाशिक : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी अजून एकदा वादाला निमंत्रण देत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते,अशी खोचक टीका केली आहे. तसेच शेतकर्‍यांबाबत वास्तव वक्तव्य केल्याचे सांगत रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची पाठराखण केली आहे.नाशिक सिटीझम फोरमच्या कार्यक्रमासाठी नाशिकला आले असता शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्त्यांवर शंभर टक्के उपाय सध्या तरी सापडत नसल्याचे सांगत त्यांनी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शेतकर्‍यांसाठी केली जाणारी कर्जमाफीविषयी केलेल्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. राजन अर्थतज्ज्ञ असून, त्यांचा आर्थिक अभ्यास असल्याने त्यांनी ते वक्तव्य केल्याचे सांगितले. राजन यांच्या वक्तव्यास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी विरोध करीत त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याच्या विधानबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, पाटील यांना शेतीचे कळत असले तरी, आर्थिक ज्ञान नसल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. द्राक्षबागा व फळबागांचे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने दिलेली मदत तोकडी आहे. फळबागा उत्पादकांना उभे राहण्यासाठी जास्तीत जास्त निधी शासन देणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी, काही केल्या हे आत्महत्त्यांचे सत्र थांबत नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांचे प्रबोधन केल्यास आत्महत्त्या थांबू शकतील. त्याचप्रमाणे राज्यात कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृषी बजेट मांडणार काय? अशी विचारणा केली असता त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प तयार करतानाच ओढाताण करावी लागणार आहे. त्यामुळे कृषीसाठी वेगळा वेगळा अर्थसंकल्प तयार करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)इन्फो..निर्णय मानेंचा, शासन अंधारातकृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आडत बंद करण्याचा निर्णय कृषिमंत्री अथवा सहकारमंत्र्यांना माहिती न देताच परस्पर स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी पणन संचालक सुभाष माने यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. वस्तुत: निर्णय शेतकरी हिताचा असला तरी आम्हाला त्याची कल्पना नसल्याने व्यापारी, आडतदारांना उत्तरे द्यावी लागली. लवकरच या निर्णयाला दिलेली स्थगिती उठविण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.