शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
3
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
4
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
5
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
6
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
7
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
8
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
9
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
10
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
11
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
12
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
13
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
14
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
15
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
16
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
17
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
18
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
19
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
20
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?

‘पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांत काय केले?’

By admin | Updated: August 30, 2014 02:41 IST

पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयावर आतापर्यंत काय केले, असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना उत्तर मागितले आहे

नवी दिल्ली : पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयावर आतापर्यंत काय केले, असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना उत्तर मागितले आहे. तपासाच्या प्रक्रियेला कायदा व सुव्यवस्थेपासून वेगळे करणे हेच पोलीस सुधारणेचे मूळ तत्त्व आहे, असेही स्पष्ट केले.पोलीस सुधारणेबाबत अनेक मुद्दे समाविष्ट असून, उपरोक्त मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे न्या. तीरथसिंग ठाकूर यांच्या खंडपीठाने म्हटले. पोलीस अधिकाऱ्यांचा निश्चित कार्यकाळ, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बदल्या तसेच पोलीस प्रतिष्ठान मंडळांची स्थापना यांसारख्या मुद्यांवर नंतर विचार केला जाईल, असे खंडपीठाने म्हटले. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक प्रकाशसिंग यांच्या याचिकेवर न्यायालयाने राज्यांना विविध प्रकारचे निर्देश दिले होते.दुस-यांदा मागितले उत्तर...पोलीस सुधारणेबाबत २००६ मध्ये निर्णय देण्यात आला होता, मात्र राज्यांनी त्यावर अंमलबजावणी केली नाही.गंभीर गुन्ह्यांसाठी वेगळे विशेष पोलीस दल स्थापन करावे, असेही बजावत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ११ एप्रिल रोजी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस पाठवून अंमलबजावणीबाबत उत्तर मागितले होते. राज्य सरकारांनी सुरक्षा आयोग स्थापन करावा, पोलीस प्रमुखांच्या नियुक्तीबाबत पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब, त्यांना निश्चित कार्यकाळ ठरवून देणे, कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यापासून तपास कार्य वेगळे करणे, जनतेच्या आशा-आकांक्षेचे प्रतिबिंब दिसावे यासाठी नवा पोलीस कायदा आणणे, यासारख्या निर्देशांच्या अंमलबजावणीची सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दखल घेतली आहे.