शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
5
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
6
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
7
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
8
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
9
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
10
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
11
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
12
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
13
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
14
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
15
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
16
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
17
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
18
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
19
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
20
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!

पाक बोटीचे नेमके झाले काय?

By admin | Updated: February 19, 2015 01:33 IST

मी पाकिस्तानी बोट उडविण्याचा आदेश दिला होता’’, असा दावा तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे तटरक्षक दल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

अधिकाऱ्याच्या आदेशाने वाद : संरक्षणमंत्री म्हणतात, तो आत्मघाती स्फोटचनवी दिल्ली : ‘‘आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालणार नव्हतो, मी पाकिस्तानी बोट उडविण्याचा आदेश दिला होता’’, असा दावा तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे तटरक्षक दल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. दरम्यान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानी बोट आत्मघाती स्फोटात उद्ध्वस्त झाल्याच्या दाव्यावर सरकार ठाम असल्याचा खुलासा करतानाच त्याबाबत लवकरच पुरावे सादर करण्याची ग्वाही दिली आहे.सरकारने ३१ डिसेंबर २०१४ च्या रात्री पाकिस्तानी बोट आत्मघाती स्फोटात नष्ट झाल्याची माहिती दिली होती. दुसरीकडे तटरक्षक दलाचे अधिकारी लोशाली यांनी मीच बोट उडविण्याचा आदेश दिल्याचा खळबळजनक दावा केल्याने आणि त्यासंबंधी ‘आॅडियो क्लीपिंग’ जारी झाल्यामुळेया प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.स्फोटात उद्ध्वस्त झालेल्या बोटीच्या चालक दलात संशयित अतिरेकी होते. त्यांनी बोटीला आग लावून स्फोट घडवून आणला असा दावा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या घटनेनंतर केला होता. मीच पाकिस्तानी बोट उडविण्याचा आदेश दिला होता, असा दावा लोशाली यांनी केल्यासंबंधी वृत्त मंगळवारी एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केले. ‘‘तुम्हाला ३१ डिसेंबरची रात्र आठवत असेलच. आम्ही त्या पाकिस्तानी बोटीला उडवून दिले. त्यावेळी मी गांधीनगरला होतो. त्या रात्री मी आमच्या जवानांना आदेश दिला, बोट उडवून द्या. त्यांना बिर्याणी खाऊ घालण्याची आमची इच्छा नाही’’ असे लोशाली म्हणत असल्याचे ध्वनिफितीत ऐकायला येते. पोरबंदरपासून ३६५ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात ती पाकिस्तानी बोट आग लागून नष्ट झाली होती. अतिरेक्यांनीच स्फोट घडवून ती उडविल्याचा दावा आजवर केला जात होता.व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवणारतटरक्षक अधिकारी लोशाली यांच्या विधानासंबंधी व्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रत मागवून सोमवारपर्यंत सर्व तथ्य समोर आणले जाईल, असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. देशात १५ ते १६ लाख कर्मचारी आहेत. एखादा कर्मचारी चुकीचे विधान करीत असेल तर त्यासाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही. अशा कर्मचाऱ्यावर फार तर शिस्तभंगाची कारवाई करता येते. त्यामुळे वस्तुस्थिती बदलत नाही, असेही ते म्हणाले.च्या वृत्ताबाबत तटरक्षक दलाने बचावात्मक धोरण अवलंबले असून लोशाली यांनी अशा प्रकारचे विधान केल्याचा इन्कार केला आहे. हे वृत्त सत्याला धरून नाही. या मोहिमेशी माझा कोणताही संबंध नव्हता.च्जे काही घडले त्याची मला माहिती नाही. माझे म्हणणे विपर्यस्तरीत्या मांडण्यात आले आहे. कोणत्याही राष्ट्रविरोधी घटकांना आम्ही उल्लंघनाची मुभा देणार नाही. आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालायला जात नाहीय, असे मी म्हणाले होतो, असा खुलासाही त्यांनी केला.च्ते पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की, ही मोहीम पूर्णपणे गोपनीय होती. त्याबाबत मला माहिती देण्यात आली नव्हती. या मोहिमेचे नेतृत्व माझे वरिष्ठ अधिकारी वायव्य क्षेत्राचे महानिरीक्षक कुलदीपसिंग श्योरन यांच्याकडे होते.च्या घडामोडीनंतर महानिरीक्षक के.आर. नौटियाल यांनी लोशाली यांचे बयाण मिळाल्याची माहिती दिली. लोशाली यांनी अशा प्रकारचे कोणतेही वक्तव्य केल्याचा इन्कार केल्याचे त्यांनी नमूद केले.कोणते पाप मोठे? काँग्रेसचा सवालच्पाकिस्तानी बोट उडविणे हे मोठे पाप आहे की देशाशी खोटे बोलणे? याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आत्मचिंतन करावे असे सांगत काँग्रेसने केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. त्या बोटीत पाकिस्तानी अतिरेकी होते मग त्यांची बोट उडविण्यात लाज कसली? असा सवाल काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी टिष्ट्वटरवर केला. च्बोटीतील संशयित अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणल्याच्या दाव्यावर सरकार ठाम असून त्याबात लवकरच सर्व पुरावे सादर करेल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बेंगळुरू येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. च्सरकार आपल्या याआधीच्या भूमिकेवर ठाम असून लवकरच त्याबाबत पुरावे सादर केले जातील. एखादा अधिकारी सरकारच्या भूमिकेशी विसंगत विधान करीत असेल तर तो शिस्तभंगाचा मुद्दा आहे. तटरक्षक दलाने बोटीला घेरल्यानंतर अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोटात बोटीला उडवून दिले, असा दावा संरक्षण मंत्रालयाने त्यावेळी केला होता.