शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

गंगास्नानाने लाभ काय?

By admin | Updated: March 20, 2015 01:31 IST

‘नमामि गंगे ’ म्हणत गंगा नदीसाठी खास मंत्रालय देणारे मोदी सरकार लोकसभेत अचंबित झाले ते त्यांच्याच पक्षाच्या प्रभातसिंग प्रतापसिंग चौहान या खासदाराने विचारलेल्या कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नाने.

नवी दिल्ली : ‘नमामि गंगे ’ म्हणत गंगा नदीसाठी खास मंत्रालय देणारे मोदी सरकार लोकसभेत अचंबित झाले ते त्यांच्याच पक्षाच्या प्रभातसिंग प्रतापसिंग चौहान या खासदाराने विचारलेल्या कोड्यात टाकणाऱ्या प्रश्नाने.गंगा नदी आली कुठून? या पवित्र नदीत स्नान केल्याने कोणता लाभ होतो? असा प्रश्न चौहान यांनी केल्यानंतर लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनाही हा काय प्रश्न झाला? असे विचारल्यावाचून राहवले नाही. सरकारनेही राजा भगीरथाने गंगा आणली असे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.जल संसाधन आणि नदी विकास राज्यमंत्री सावरलाल जाट एका पूरक प्रश्नाला उत्तर देत असताना चौहान यांनी हा प्रश्न विचारत धमाल उडवून दिली. गंगा नदीला कुणी आणले? का आणले? या नदीत स्नान केल्याने कोणते फायदे होतात? हे जाणून घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर एकच हंशा पिकला. अनेकांना आश्चर्य व्यक्त करण्यावाचून राहवले नाही. जाट उत्तरात म्हणाले की, ही बाब ऐतिहासिक आहे. लोकांच्या कल्याणासाठी राजा भगीरथाने गंगा नदीला आणले. या नदीची पूजा केली जाते. (भगीरथाने तपश्चर्या करीत भगवान शिवाला वर मागून ही नदी स्वर्गातून पृथ्वीवर पाठवायला लावले, असा पौराणिक दाखला देण्याचा जाट यांचा उद्देश होता). आणि वटवृक्षही... भाजपचे अन्य सदस्य रतनलाल कटारिया हेही अशाच एका प्रश्नाने चर्चेत आले. त्यांनी लक्षवेधी सादर करीत कुरुक्षेत्रावरील वटवृक्षाला स्मारक घोषित करण्याची मागणी केली. सरकारने त्यावर दिलेल्या उत्तरावर त्यांनी संतापही व्यक्त केला. हरियाणातील कुरुक्षेत्रावर ज्या वटवृक्षाखाली भगवान कृष्णांनी गीता उपदेश केला ते स्थळ स्मारक घोषित का होऊ शकत नाही? भाजप सरकार तर प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सरकारचे उत्तर समाधानकारक नाही. पाच हजार वर्षांपूर्वी कृष्णांनी वटवृक्षाखाली गीता उपदेश दिला होता. जगद्गुरू शंकराचार्यही त्या ठिकाणी जाऊन आले होते. मंत्री म्हणतात ते स्मारक नाही. केवळ विटा ठेवल्याने स्मारक बनते काय? हजारो भाविक तेथे जातात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणीही तेथे जाऊन आले होते. त्यावर सांस्कृतिक अािण पर्यटनमंत्री महेश शर्मा यांनी प्राचीन स्मारक, तसेच पुरातत्वीय अवशेष कायदा १९५८ चा दाखला दिला. कोणतीही वास्तू, स्तूप, दफन भूमी, गुहा तसेच कलात्मक रचनाच त्यात मोडतात, असे सांगितले. मात्र कटारिया यांचा रोष कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्प. बंगालमधील एका ननवरील बलात्काराच्या घटनेनंतर एका साध्वीबाबतही असभ्य प्रकार घडल्याची निंदा लोकसभेत केली जात असताना भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य हमरीतुमरीवर उतरले. वारंवार आवाहन करूनही सदस्य शांत होत नाही हे बघून लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन उद्विग्नपणे म्हणाल्या की, दोन्ही पक्षाच्या सदस्यांना लाठी आणून देऊ काय? हे काय चालले आहे? लढायचे असेल तर बाहेर जा.च्सभागृहाचा वेळ वाया जात आहे. आता तर मर्यादा ओलांडली जात आहे. हे सभागृह त्यासाठी बनलेले नाही. महिलांसंबंधी गैरवर्तनाबाबत राजकारण केले जाऊ नये.