शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

म्हणे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय गुजरातेत हवे

By admin | Updated: November 29, 2014 02:27 IST

पश्चिम रेल्वेचे मुंबई येथील मुख्य कार्यालय अहमदाबादला हलविण्यासाठी भाजपा खासदाराने लोकसभेत केलेल्या मागणीवरून राज्यातील शिवसेना व काँग्रेस खासदार कमालीचे आक्रमक झाले आहेत.

भाजपा खासदाराची मागणी : शिवसेना, काँग्रेस लोकसभेत आक्रमक
नवी दिल्ली : पश्चिम रेल्वेचे मुंबई येथील मुख्य कार्यालय अहमदाबादला हलविण्यासाठी भाजपा खासदाराने लोकसभेत केलेल्या मागणीवरून राज्यातील शिवसेना व काँग्रेस खासदार कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यातून महाराष्ट्र-गुजरात असा प्रादेशिक अस्मितेचा वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत.
प. रेल्वेचे मुख्यालय गुजरातेत हलविण्याच्या मागणीवर सोमवारी लोकसभेतच भाजपाचा त्रिफळा उडवण्याचा इशारा देणा:या काँग्रेस- शिवसेनेने दक्षिण रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद आहे, ते पहिले नांदडेला आणा, असे प्रतिआव्हानही दिले. तर राष्ट्रवादीने या विधानाचा निषेध करीत असल्याचे सांगून पक्ष स्तरावर भूमिका घेऊ, असे म्हटले. शुक्रवारी शून्य प्रहरात अहमदाबाद (पश्चिम)चे भाजपा खा. किरीट सोलंकी यांनी पश्चिम रेल्वेचे कामकाज सोपे व्हावे म्हणून मुंबईत असलेले पश्चिम रेल्वेचे कार्यालय अहमदाबाद येथे स्थानांतरित करावे, अशी मागणी केली. अहमदाबाद हे शहर मध्यवर्ती असून, तेथून रेल्वेचे कामकाज सुलभ होऊ शकेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मुंबई- महाराष्ट्राच्या जिव्हाळ्य़ाचा हा विषय असल्याने त्याला सभागृहात कडाडून विरोध होईल, अशी शक्यता असताना शून्य प्रहर संपेस्तोवर विरोध करायला शिवसेनेचा एकही खासदार सभागृहात उपस्थित नव्हता. बहुतेकांनी मुंबई गाठली होती, तर काही पक्षाच्या कामासाठी संसदेतीलच पक्ष कार्यालयात होते. दुपारनंतर या विषयाला सभागृहाबाहेर पाय फुटल्यावर वसेनेने भूमिका घेण्याची तयारी केली.  (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
सेनेने घेतला समाचार
शिवसेना प्रवक्ते खा. अरविंद सावंत यांनी सोलंकींच्या विधानाचा समाचार घेतला. सावंत म्हणाले, की जे जे महाराष्ट्रात चांगले आहे, ते सर्वच गुजरातकडे नेण्याची सुरू असलेली तयारी हाणून पाडू. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुख्यालयामुळे कोणती गैरसोय होत आहे. इतकी वर्षे चांगले सुरू आहे, काहीच बिघडत नाही. बेळगावचे ‘बेळगावी’ झाले ते सहन करायचे, हि:याचे कारखाने गुजरातला न्यायचे, रिझव्र्ह बँकेचा एक विभाग न्यायचा, एअर इंडियाचे कार्यालय पळवायचे, आता ही नवी मागणी गुजरातमधूनच करायची हा प्रकार त्यांनी थांबवावा.
 
 
मनसुबे उधळून लावू
च्काँग्रेसचे खा. राजीव सातव म्हणाले, 
भाजपाचे मराठी अस्मितेला तडे देण्याचे 
 हे मनसुबे उधळून लावू. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय नांदेडला आणा, ही आमची  
3क् वर्षापासूनची मागणी आहे. 
च्अकोला, वाशीमपासून प्रवाशी यामुळे अडचणीत आले आहेत. गेल्या अधिवेशनात मी आणि खा. चंद्रकात खैरे यांनी ही मागमी केली होती. त्यावर सरकारचे उत्तरच नाही, आणि आता ही नवीनच मागणी पुढे करून वाद उकरून काढण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. 
च्मोदी हे गोपीनाथ मुंडे यांना लहान भाऊ मानायचे, त्यामुळे रेल्वे सुरू करत असलेल्या  विद्यापीठाला मुंडेंचे नाव दिले पाहिजे, अशी मागणी सातव यांनी केली. 
च्राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक म्हणाले, भाजपा खासदाराची मागणी संतापजनक आहे. निषेधच करतो. पक्ष याबाबत सोमवारी भूमिका घेमार आहे, असे ते म्हणाले. 
 
16 हजार कोटींचे उत्पन्न प. रेल्वेला उपनगरीय लोकल, मालवाहतूक व लांब पल्ल्याच्या वाहतूकमधून वर्षाला मिळते.
 
100ट्रेन पश्चिम रेल्वेमार्गावर गुजरात ते मुंबई प्रवासासाठी धावतात. यातून मोठे उत्पन्न मिळते.
 
उत्पन्नावर डोळा? 
प. रेल्वेच्या हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर गुजरातचा डोळा असल्यानेच मुख्यालय तिकडे हलवण्याची मागणी होत आहे. मालवाहतूक व लांब पल्ल्याची सर्वाधिक वाहतूक गुजरातेतनूच होत असल्याने थेट हाच दावा न करता वेगळे कारण पुढे करीत असल्याची चर्चा आहे.