शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ममतांना अटक झाल्यास पश्चिम बंगाल पेटेल - तृणमूल खासदाराची धमकी

By admin | Updated: December 31, 2014 20:28 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना कोणीही हात लावू शकत नाही, त्यांना अटक झाल्यास संपूर्ण बंगाल पेटेल, अशी धमकी तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
संदेशखली (पश्चिम बंगाल), दि. ३१ -  शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सध्या रन पेटलेले असतानाच या घोटाळ्याप्रकरणी जर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना अटक झाली तर संपूर्ण पश्चिम बंगाल पेटेल असा इशारा तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रिस अली यांनी दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात पक्षावर झालेले आरोप खोटे असून त्याप्रकरणी भाजपाने सीबीआयचा गैरवापर करू नये. ममता बॅनर्जींचा या घोटाळ्यात बिलकूल सहभाग नाही, जर त्यांच्या प्रतिमेस धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला तर  परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले. 
शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंत तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा तसेच खासदार कुणाल घोष आणि श्रींजॉय बोस यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या गुंतवणूकदारांचे कथित १० हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. या घोटाळ्यात ममता बॅनर्जींचा हात असल्याता आरोप तृणमूल काँग्रसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी केला असून याप्रकरणी सध्या रान पेटले आहे. 
याच पार्श्वभूमीवर बोलताना इद्रिस अली यांनी पक्षावर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. ममता बॅनर्जी या फक्त बंगालची नव्हे तर संपूर्ण देशाची 'अग्निकन्या' आहेत. त्यांना कोणीही हात लावला अथवा अटक केली तर संपूर्ण राज्य पेटून उठेल आणि अनेक लोक त्यात होरपळून निघतील, अशी धमकीच अली यांनी दिली आहे. कोणीही बॅनर्जी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला तर जनता ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.