शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

ममतांना अटक झाल्यास पश्चिम बंगाल पेटेल - तृणमूल खासदाराची धमकी

By admin | Updated: December 31, 2014 20:28 IST

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना कोणीही हात लावू शकत नाही, त्यांना अटक झाल्यास संपूर्ण बंगाल पेटेल, अशी धमकी तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने दिली आहे.

ऑनलाइन लोकमत
संदेशखली (पश्चिम बंगाल), दि. ३१ -  शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सध्या रन पेटलेले असतानाच या घोटाळ्याप्रकरणी जर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना अटक झाली तर संपूर्ण पश्चिम बंगाल पेटेल असा इशारा तृणमूल काँग्रेसचे खासदार इद्रिस अली यांनी दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणात पक्षावर झालेले आरोप खोटे असून त्याप्रकरणी भाजपाने सीबीआयचा गैरवापर करू नये. ममता बॅनर्जींचा या घोटाळ्यात बिलकूल सहभाग नाही, जर त्यांच्या प्रतिमेस धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला तर  परिणाम भोगावे लागतील, असेही ते म्हणाले. 
शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंत तृणमूल काँग्रेसचे वाहतूक मंत्री मदन मित्रा तसेच खासदार कुणाल घोष आणि श्रींजॉय बोस यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामच्या गुंतवणूकदारांचे कथित १० हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. या घोटाळ्यात ममता बॅनर्जींचा हात असल्याता आरोप तृणमूल काँग्रसचे निलंबित खासदार कुणाल घोष यांनी केला असून याप्रकरणी सध्या रान पेटले आहे. 
याच पार्श्वभूमीवर बोलताना इद्रिस अली यांनी पक्षावर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. ममता बॅनर्जी या फक्त बंगालची नव्हे तर संपूर्ण देशाची 'अग्निकन्या' आहेत. त्यांना कोणीही हात लावला अथवा अटक केली तर संपूर्ण राज्य पेटून उठेल आणि अनेक लोक त्यात होरपळून निघतील, अशी धमकीच अली यांनी दिली आहे. कोणीही बॅनर्जी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला तर जनता ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.