शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

बंगालमध्ये आता शिव विरुद्ध राम!; ममता दीदी महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज भरणार

By देवेश फडके | Updated: March 4, 2021 14:36 IST

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर (West Bengal Assembly Election 2021) आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये महादेव शिवशंकर विरुद्ध श्रीराम असे चित्र पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) निवडणूक अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे.

ठळक मुद्दे११ मार्च रोजी ममता बॅनर्जी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणारनिवडणूक अर्ज दाखल करण्याची तयारी सुरूमहाशिवरात्रीचा दिवस निवडण्यामागे खास कारण

कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर (West Bengal Assembly Election 2021) आता पुढील टप्प्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यात मतदान होणार असून, राजकीय रणधुमाळी अधिक आक्रमक होताना दिसत आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये महादेव शिवशंकर विरुद्ध श्रीराम असे चित्र पाहायला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी ममता बॅनर्जी निवडणूक अर्ज दाखल करतील, असे म्हटले जात आहे. (west bengal assembly election 2021 mamta banerjee will file nomination on mahashivratri)

पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) ११ मार्च रोजी नंदीग्राम येथून अर्ज दाखल करून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे. याच दिवशी महाशिवरात्रीचे महापर्व आहे. जय श्रीराम किंवा जय सीयाराम या घोषणांवरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस रामद्रोही असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र, हा भाजपचा हा निवडणूक स्टंट आहेत, असा पलटवार तृणमूलकडून करण्यात येत आहे. 

 

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश; आम्ही पुन्हा सत्तेत येऊ अन्...'

निवडणूक अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ११ मार्च रोजी नंदीग्राम येथून निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. नंदीग्राम येथे तात्पुरत्या निवासस्थानाची सोय करण्यात आली आहे. १० मार्च रोजी ममता बॅनर्जी मिदनापूर येथील हल्दिया येथे जाणार आहेत. येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक आटोपल्यानंतर ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे जाणार आहेत.

महाशिवरात्रीचा दिवस का निवडला?

ममता बॅनर्जी यांनी महाशिवरात्रीचा दिवस निवडण्यामागे खास कारण असल्याचे सांगितले जात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी निवडणूक अर्ज दाखल करून आपण शिवभक्त असून, हिंदुंचा पवित्र सण जीवनातील महत्त्वाचे काम करण्यासाठी निवडला आहे. कारण हिंदू बांधव जीवनातील महत्त्वाचे काम पवित्र, शुभ दिनी करतो, असा संदेश ममता बॅनर्जी यांना बंगालच्या जनतेला द्यायचा आहे, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाMahashivratriमहाशिवरात्री