शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

हो आम्ही चुकलो ! केजरीवालांनी अखेर केला पराभव मान्य

By admin | Updated: April 29, 2017 08:50 IST

पंजाब, गोवा आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली चूक झाली असल्याचं मान्य केलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29- पंजाब, गोवा आणि दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली चूक झाली असल्याचं मान्य केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र शेअर केलं असून आम्ही चुकलो सांगत पराभव स्विकारला आहे. "गेल्या दोन दिवसांत मी अनेक स्वयंसेवक आणि मतदारांशी बातचीत केली. आम्ही अनेक चुका केल्या हे वास्तव आहे. आमच्या चुकांचं आत्मपरिक्षण करुन त्या गोष्टी सुधरवण्याचा प्रयत्न करु", असं अरविंद केजरीवाल बोलले आहेत.
 
केजरीवाल यांनी लिहिलं आहे की, "आमच्या चुका सुधारण्याची वेळ आली आहे. हे बोलणं गरजेचं आहे. आम्हाला चिंतन केलं पाहिजे. बहाण्यांची नाही तर अॅक्शन घेण्याची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्या कामाला लागलं पाहिजे. आम्ही अनेकवेळा घसरलो असून स्वत:ला ओळखून पुन्हा उभं राहणं महत्वाचं आहे". दिल्ली महापालिकेतील पराभवामुळे सरकारच्या कामावर काहीच प्रभाव पडणार नाही असा विश्वास केजरीवाल यांनी जनतेला दिला आहे. 
 
दिल्ली महापालिकेतील पराभवानंतर अनेकांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. पक्षाची स्थापना करताना असलेल्या मुख्य सदस्यांपैकी एक कुमार विश्वास यांनीही शुक्रवारी केजरीवाल यांच्यावर चुकीच्या लोकांना तिकीट देण्याचा आरोप लावला. निवडणुकीत ईव्हीएम नाही तर जनतेने हरवलं असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. कुमार विश्वास यांच्याव्यतिरिक्त केजरीवाल यांचे निकटवर्तीय राहिलेला आपचे माजी नेता मयंक गांधी यांनातर केजरीवालांना सत्तेची लालसा असल्याची टीका केली होती. तसंच पक्षाचे खासदार भगवंत मान यांच्यासहित अनेकांनी पक्षात सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.
 
दिल्ली महानगरपालिका निवडणुकांमध्ये सपाटून मार खाणा-या आम आदमी पार्टीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ लागला आहे. शिवाय पक्षनेतृत्वाविरोधातही उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. आम आदमी पार्टीविरोधी भूमिका घेत विश्वास यांनी म्हटले आहे की, "दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत ईव्हीएमने नाही तर जनतेनं "आप"ला हरवले आहे." 
 
शिवाय केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लोबाल करायला नको होते, असेही विश्वास म्हणाले आहेत. एक वृत्तवाहिनीशी बोलताना विश्वास यांनी सांगितले की, पार्टीमध्ये व्यापक बदल करण्यासाठी प्रयत्न करणं गरजे आहे. ईव्हीएममुळे आमचा पराभव झाला नाही. तर आम्हाला जनतेचं समर्थन नाही मिळाले. आम्ही आपल्या कार्यकर्त्यांसोबत व्यवस्थित संवाद  साधू शकलो नाहीत". 
 
 विश्वास यांनी पार्टीचे निर्णय बंद खोलीत घेतल्याचा आरोप करत सांगितले की, अनेक निर्णय बंद खोलीत झाले.  दिल्ली मनपा निवडणुकीत अयोग्य उमेदवारांना तिकीट देण्यात आले. ईव्हीएममध्ये गोंधळ असणं हा निवडणुकीचा भाग आहे. याविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेक मार्ग आहेत. निवडणूक आयोग, कोर्ट आहे जेथे आपण आपले म्हणणे मांडू शकतो.