शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

...म्हणून वरिष्ठ मंत्र्यांना डावलून मोदींनी रामनाथ कोविंद यांना दिली पसंती

By admin | Updated: June 20, 2017 09:15 IST

भाजपा प्रणीत एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल यावर मागच्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरु होती. रामनाथ कोविंद यांच्या नावावर एकमत होण्याआधी पडद्याआड बरेच काही घडले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 20 - भाजपा प्रणीत एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार कोण असेल यावर मागच्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये बरीच चर्चा सुरु होती. अखेर रामनाथ कोविंद यांच्या रुपाने या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पण रामनाथ कोविंद यांच्या नावावर एकमत होण्याआधी पडद्याआड बरेच काही घडले. राष्ट्रपतीपदासाठी मोदी सरकारमधील परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची नावे चर्चेत होती.
 
पण  मोदींनी सहकारी मंत्र्यांना राष्ट्रपतीपदासाठी पदमुक्त करण्यास नकार दिला. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज यांच्या सारखे कार्यक्षम मंत्री बाहेर पडल्यास सरकार कमकुवत होण्याची शक्यता असल्याने मोदींनी त्यांना सोडण्यास नकार दिला. आपली भूमिका त्यांनी भाजपाच्या संसदीय बोर्डासमोर मांडली. टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. 
 
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा संभाळण्यासाठी मनोहर पर्रिकर संरक्षणमंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले. त्यानंतर पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचे अकाली निधन झाले. हे दोघे सुद्धा कार्यक्षम मंत्री होते.  सध्या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी आहे तर, विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी संभाळत आहेत. 
 
आणखी वाचा 
राष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे उमेदवार रामनाथ कोविंद
फक्त मतांसाठी राष्ट्रपती निवडणुकीत दलित चेहरा
 
संसदीय बोर्ड ही भाजपाची सर्वोच्च समिती असून या समितीपुढे राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवताना पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची नावे सुद्धा आली. पण या दोन नावांवर एकमत बनू शकले नाही. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू, माजी लोकसभा उपाध्यक्ष कारीया मुंडा यांची नावे सुद्धा चर्चेत होती. ओदिशा आणि झारखंडमधून येणारे मुर्मू आणि मुंडा आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. पण त्यांच्या नावावर सुद्धा एकमत बनू शकले नाही. 
 
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचे नाव सुद्धा संसदीय समितीसमोर ठेवले. पण त्यावरही एकमत बनू शकले नाही. पण बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर मात्र संसदीय समितीचे एकमत झाले. दलित समाजाला भाजपाकडे वळवण्यासाठी कोविंद यांची उमेदवारी भाजपाला फायद्याची ठरू शकते. रामनाथ कोविंदे हे शेतकरी कुटुंबातील असून त्यांना कायद्याची पार्श्वभूमी आहे. दोनवेळा राज्यसभेचे खासदार राहिलेले कोविंद यांना सामाजिक, राजकीय आणि संविधानिक विषयांची चांगली जाण आहे. विनम्रता आणि वादग्रस्त विधाने न करणे हे सुद्धा कोविंद यांच्या पथ्यावर पडले.