शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

योगगुरू मुमताज अली यांच्या आशा यात्रेचे हिवरेबाजार येथे स्वागत

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

हिवरेबाजार : शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी पदयात्रा करणारे केरळमधील त्रिवेंद्रम येथील योगगुरू श्री एम. ऊर्फ मुमताज अली यांचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे फुलांचा वर्षाव करत विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच आदर्शगाव संकल्पनेचे पोपटराव पवार यांनी भव्य स्वागत केले.

हिवरेबाजार : शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी पदयात्रा करणारे केरळमधील त्रिवेंद्रम येथील योगगुरू श्री एम. ऊर्फ मुमताज अली यांचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे फुलांचा वर्षाव करत विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच आदर्शगाव संकल्पनेचे पोपटराव पवार यांनी भव्य स्वागत केले.
मुमताज अली यांची पदयात्रा सुमारे ७५०० किमी व ११ राज्यामधून जाणार आहे. या यात्रेचे गुरुवारी सकाळी ११ वाजता हिवरेबाजार येथे आगमन झाले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे शालेय पथक तसेच ग्रामस्थांनी टाळांचा गजर करत या पदयात्रेची गावातून भव्य अशी मिरवणूक काढली. योगगुरू अली यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी १२ जानेवारी २०१५ पासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढली. ही पदयात्रा दररोज २० ते २५ कि.मी. अंतर चालते. ११ राज्ये, ८६ जिल्हे, ४५० गावामधून सुमारे ५०० दिवस या पदयात्रेचा प्रवास आहे. सर्व जाती धर्मातील लोकांशी संवाद साधून एकात्मतेचा संदेश देणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेतील भक्तांनी दिवसभर हिवरेबाजार गावाची पाहणी केली. गावकर्‍यांनी केलेले स्वागत, गावाचे व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण पाहून अली यांनी गावकर्‍यांचे कौतुक केले. सायंकाळी अली यांनी गावकर्‍यांशी संवाद साधून एकात्मतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

फोटो...
कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ७५०० कि.मी. पदयात्रा करणारे योगगुरू मुमताज अली यांच्या पदयात्रेचे हिवरेबाजार येथे भव्य स्वागत करण्यात आले. (नागेश सोनवणे)

(फोटो- १६ हिवरेबाजार)