श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत
By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST
उदगीर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी उदगीर शहरात आगमन होताच स्वागत करण्यात आले.
श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे स्वागत
उदगीर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी उदगीर शहरात आगमन होताच स्वागत करण्यात आले. उदगीरच्या उमा चौकात या पालखीचे आगमन होताच नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, चंद्रशेखर भोसले यांनी पालखीचे स्वागत केले. वाजत गाजत व फटाक्यांची आतषबाजी करीत या पालखीची शहराच्या मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शहरातील भाविक, भक्तगण सहभागी झाले होते. दुपारी ही पालखी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या निवासस्थानी विसावली. या ठिकाणी भक्तगणांची दर्शनासाठी मोठी रिघ लागली होती. मंगळवारी सकाळी ६ वाजता ही पालखी देवणीकडे मार्गस्थ होणार आहे.