शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

मध्यमवर्गीय, शेतकर्‍यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उत्पन्न दुप्पट
शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे उद्दीष्ट या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्राने ठेवले आहे. शेतकर्‍यांचा विचार या अर्थसंकल्पात झाल्याचे यावरून दिसते. परंतु उत्पन्न दुप्पट करीत असताना खर्च मात्र आज आहे तसाच राहावा. नाही तर उत्पादन खर्चामधील वाढ ही डोकेदुखी कायम राहील. खते, बियाण्यासंबंधी स्पष्ट धोरण दिसत नाही.
कडूजी पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

सिंचनावर तरतूद कमी
सिंचनावर सरकार वर्षभरात १७ हजार कोटी उपलब्ध करून देणार आहे. आपल्याकडी महाकाय प्रकल्प किंवा यासारखे प्रकल्प सात ते आठ हजार कोटींचे आहेत. अशी तोकडी तरतूद असली तर प्रकल्प वर्षभरात, दोन, चार वर्षात कसे पूर्ण होतील हा प्रश्न आहे.
-हर्षल चौधरी, शेतकरी

महागाई वाढतील
शासनाने इंधनाच्या करात वाढ केलेली असल्याने पुढील काळात इंधन स्वस्त झाले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ महिला, गृहीणींना होणार नाही. भाज्या, कांदे यांचे दर कमी ठेवण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागेल. असे दिसते. याशिवाय सर्वसामान्यांचा इंधनावरील खर्चही आहे तसाच रहील, असे वाटते.
-अर्चना महाजन, गृहीणी

शिक्षणाला प्रोत्साहन
अर्थसंकल्पात चैनीच्या वस्तू महाग करुन ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. करातील स्लॅबमध्येही फारसे बदल नाहीत. एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा लाभ होईल. अपंग विद्यार्थ्यांचाही विचार झाला आहे. डिजीटल शिक्षणावरही लक्ष केंद्रीत केल्याने फायदा होईल.
प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, मु.जे.महाविद्यालय

उच्चशिक्षण परवडणारे
सरकारने केलेल्या तरतुदीमुळे उच्चशिक्षण थोडे स्वस्त होऊ शकेल. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर झाली आहे. सेवा करात मात्र ०.५ टक्के वाढ केलेली असल्याने त्याचा काहीसा परिणाम या क्षेत्रावरही होऊशकतो.-प्राचार्यडॉ.एल.पी.देशमुख,नूतनमराठामहाविद्यालय



अनेक गोष्टी योग्य
चैनीच्या वस्तू महागणार असल्याचे अर्थसंकल्पातून सांगितले गेले आहे. हा निर्णय योग्य आहे. तसेच ५० लाखांचे खर खरेदीसाठी सवलत मिळणार आहे. ही सवलत नेमकी कशी मिळेल हे स्पष्टपणे पुढे यायला हवे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा.
-नीलिमा जोशी, गृहीणी