शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मध्यमवर्गीय, शेतकर्‍यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उत्पन्न दुप्पट
शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे उद्दीष्ट या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्राने ठेवले आहे. शेतकर्‍यांचा विचार या अर्थसंकल्पात झाल्याचे यावरून दिसते. परंतु उत्पन्न दुप्पट करीत असताना खर्च मात्र आज आहे तसाच राहावा. नाही तर उत्पादन खर्चामधील वाढ ही डोकेदुखी कायम राहील. खते, बियाण्यासंबंधी स्पष्ट धोरण दिसत नाही.
कडूजी पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

सिंचनावर तरतूद कमी
सिंचनावर सरकार वर्षभरात १७ हजार कोटी उपलब्ध करून देणार आहे. आपल्याकडी महाकाय प्रकल्प किंवा यासारखे प्रकल्प सात ते आठ हजार कोटींचे आहेत. अशी तोकडी तरतूद असली तर प्रकल्प वर्षभरात, दोन, चार वर्षात कसे पूर्ण होतील हा प्रश्न आहे.
-हर्षल चौधरी, शेतकरी

महागाई वाढतील
शासनाने इंधनाच्या करात वाढ केलेली असल्याने पुढील काळात इंधन स्वस्त झाले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ महिला, गृहीणींना होणार नाही. भाज्या, कांदे यांचे दर कमी ठेवण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागेल. असे दिसते. याशिवाय सर्वसामान्यांचा इंधनावरील खर्चही आहे तसाच रहील, असे वाटते.
-अर्चना महाजन, गृहीणी

शिक्षणाला प्रोत्साहन
अर्थसंकल्पात चैनीच्या वस्तू महाग करुन ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. करातील स्लॅबमध्येही फारसे बदल नाहीत. एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा लाभ होईल. अपंग विद्यार्थ्यांचाही विचार झाला आहे. डिजीटल शिक्षणावरही लक्ष केंद्रीत केल्याने फायदा होईल.
प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, मु.जे.महाविद्यालय

उच्चशिक्षण परवडणारे
सरकारने केलेल्या तरतुदीमुळे उच्चशिक्षण थोडे स्वस्त होऊ शकेल. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर झाली आहे. सेवा करात मात्र ०.५ टक्के वाढ केलेली असल्याने त्याचा काहीसा परिणाम या क्षेत्रावरही होऊशकतो.-प्राचार्यडॉ.एल.पी.देशमुख,नूतनमराठामहाविद्यालय



अनेक गोष्टी योग्य
चैनीच्या वस्तू महागणार असल्याचे अर्थसंकल्पातून सांगितले गेले आहे. हा निर्णय योग्य आहे. तसेच ५० लाखांचे खर खरेदीसाठी सवलत मिळणार आहे. ही सवलत नेमकी कशी मिळेल हे स्पष्टपणे पुढे यायला हवे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा.
-नीलिमा जोशी, गृहीणी