शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मध्यमवर्गीय, शेतकर्‍यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उत्पन्न दुप्पट
शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे उद्दीष्ट या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्राने ठेवले आहे. शेतकर्‍यांचा विचार या अर्थसंकल्पात झाल्याचे यावरून दिसते. परंतु उत्पन्न दुप्पट करीत असताना खर्च मात्र आज आहे तसाच राहावा. नाही तर उत्पादन खर्चामधील वाढ ही डोकेदुखी कायम राहील. खते, बियाण्यासंबंधी स्पष्ट धोरण दिसत नाही.
कडूजी पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

सिंचनावर तरतूद कमी
सिंचनावर सरकार वर्षभरात १७ हजार कोटी उपलब्ध करून देणार आहे. आपल्याकडी महाकाय प्रकल्प किंवा यासारखे प्रकल्प सात ते आठ हजार कोटींचे आहेत. अशी तोकडी तरतूद असली तर प्रकल्प वर्षभरात, दोन, चार वर्षात कसे पूर्ण होतील हा प्रश्न आहे.
-हर्षल चौधरी, शेतकरी

महागाई वाढतील
शासनाने इंधनाच्या करात वाढ केलेली असल्याने पुढील काळात इंधन स्वस्त झाले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ महिला, गृहीणींना होणार नाही. भाज्या, कांदे यांचे दर कमी ठेवण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागेल. असे दिसते. याशिवाय सर्वसामान्यांचा इंधनावरील खर्चही आहे तसाच रहील, असे वाटते.
-अर्चना महाजन, गृहीणी

शिक्षणाला प्रोत्साहन
अर्थसंकल्पात चैनीच्या वस्तू महाग करुन ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. करातील स्लॅबमध्येही फारसे बदल नाहीत. एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा लाभ होईल. अपंग विद्यार्थ्यांचाही विचार झाला आहे. डिजीटल शिक्षणावरही लक्ष केंद्रीत केल्याने फायदा होईल.
प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, मु.जे.महाविद्यालय

उच्चशिक्षण परवडणारे
सरकारने केलेल्या तरतुदीमुळे उच्चशिक्षण थोडे स्वस्त होऊ शकेल. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर झाली आहे. सेवा करात मात्र ०.५ टक्के वाढ केलेली असल्याने त्याचा काहीसा परिणाम या क्षेत्रावरही होऊशकतो.-प्राचार्यडॉ.एल.पी.देशमुख,नूतनमराठामहाविद्यालय



अनेक गोष्टी योग्य
चैनीच्या वस्तू महागणार असल्याचे अर्थसंकल्पातून सांगितले गेले आहे. हा निर्णय योग्य आहे. तसेच ५० लाखांचे खर खरेदीसाठी सवलत मिळणार आहे. ही सवलत नेमकी कशी मिळेल हे स्पष्टपणे पुढे यायला हवे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा.
-नीलिमा जोशी, गृहीणी