शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

एअर इंडियामध्ये प्रवाशांचे ‘जय हिंद’ने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 08:17 IST

एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही. प्रवाशांना सभ्यतेची वागणूक देत ‘जय हिंद’ या शब्दाने त्यांचे स्वागत करीत राष्ट्रीय भावनेला बळकटी देण्याचा या शासकीय विमान कंपनीचा उद्देश असेल.एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी यांनी अलीकडेच फ्लाईट कमांडर्सना उद्देशून पाठविलेल्या शब्दांत ‘जय हिंद’ हा शब्द वापरण्याबाबत उल्लेख केला आहे. कमांडर्सनी प्रवाशांशी सातत्याने जोडले राहावे. पहिल्यांदा संवाद साधताना जय हिंदने सुरुवात केली तर त्याचा चांगला प्रभाव पडू शकेल, असे लोहानी यांनी नमूद केले. लोहानी यांनी नुकसानीत असलेल्या एअर इंडियाची नफा कमावण्याच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत सभ्यतेने वागावे. चेहरा हसतमुख असावा. प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना चांगला अनुभव यावा यासाठी खबरदारी घेतली जावी, अशी सूचनाही लोहानी यांनी दीर्घ पत्रात केली आहे. (वृत्तसंस्था) 

विलंब आणि गैरसोयीमुळे प्रतिमेवर परिणाम... अलीकडे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: अपंगांना होणारा त्रास किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा, कर्मचाऱ्यांमधील भांडणांतून होणाऱ्या विलंबामुळे या विमान कंपनीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. विमान कर्मचारी उड्डाणाच्या वेळी आणि उतरताना ‘नमस्कार’ हा शब्द पारंपरिकरीत्या वापरत आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत वाद न घालता किंवा कोणताही त्रागा न करता चेहऱ्यावर हसू ठेवत सभ्यतेची वागणूक द्यावी. आवाजात गोडवा असावा, असे लोहानी यांना वाटते.

अर्ध्या तासापेक्षा जास्त विलंब नको... विमान धावपट्टीवर असताना (एओजी) अर्ध्या तासापेक्षा विलंब होत असल्यास विमानतळ व्यवस्थापक किंवा स्थानक व्यवस्थापकाने तातडीने घटनास्थळी जाऊन प्रवाशांना त्याबाबत माहिती द्यावी. प्रवाशांसोबत पुरेसा सुसंवाद साधतानाच त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची विनाविलंब काळजी घेतली जावी. प्रवाशांच्या समस्या सोडवताना या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन अवलंबावा, असेही लोहानी यांनी संदेशात नमूद केले आहे.