शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

एअर इंडियामध्ये प्रवाशांचे ‘जय हिंद’ने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 08:17 IST

एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही. प्रवाशांना सभ्यतेची वागणूक देत ‘जय हिंद’ या शब्दाने त्यांचे स्वागत करीत राष्ट्रीय भावनेला बळकटी देण्याचा या शासकीय विमान कंपनीचा उद्देश असेल.एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी यांनी अलीकडेच फ्लाईट कमांडर्सना उद्देशून पाठविलेल्या शब्दांत ‘जय हिंद’ हा शब्द वापरण्याबाबत उल्लेख केला आहे. कमांडर्सनी प्रवाशांशी सातत्याने जोडले राहावे. पहिल्यांदा संवाद साधताना जय हिंदने सुरुवात केली तर त्याचा चांगला प्रभाव पडू शकेल, असे लोहानी यांनी नमूद केले. लोहानी यांनी नुकसानीत असलेल्या एअर इंडियाची नफा कमावण्याच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत सभ्यतेने वागावे. चेहरा हसतमुख असावा. प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना चांगला अनुभव यावा यासाठी खबरदारी घेतली जावी, अशी सूचनाही लोहानी यांनी दीर्घ पत्रात केली आहे. (वृत्तसंस्था) 

विलंब आणि गैरसोयीमुळे प्रतिमेवर परिणाम... अलीकडे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: अपंगांना होणारा त्रास किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा, कर्मचाऱ्यांमधील भांडणांतून होणाऱ्या विलंबामुळे या विमान कंपनीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. विमान कर्मचारी उड्डाणाच्या वेळी आणि उतरताना ‘नमस्कार’ हा शब्द पारंपरिकरीत्या वापरत आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत वाद न घालता किंवा कोणताही त्रागा न करता चेहऱ्यावर हसू ठेवत सभ्यतेची वागणूक द्यावी. आवाजात गोडवा असावा, असे लोहानी यांना वाटते.

अर्ध्या तासापेक्षा जास्त विलंब नको... विमान धावपट्टीवर असताना (एओजी) अर्ध्या तासापेक्षा विलंब होत असल्यास विमानतळ व्यवस्थापक किंवा स्थानक व्यवस्थापकाने तातडीने घटनास्थळी जाऊन प्रवाशांना त्याबाबत माहिती द्यावी. प्रवाशांसोबत पुरेसा सुसंवाद साधतानाच त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची विनाविलंब काळजी घेतली जावी. प्रवाशांच्या समस्या सोडवताना या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन अवलंबावा, असेही लोहानी यांनी संदेशात नमूद केले आहे.