शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियामध्ये प्रवाशांचे ‘जय हिंद’ने स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 08:17 IST

एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानांना होणाऱ्या विलंबामुळे असंख्य तक्रारींची भर पडत असताना प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दाखविली जाणारी असंवेदनशीलता किंवा आदरातिथ्याचा अभाव यापुढे दिसणार नाही. प्रवाशांना सभ्यतेची वागणूक देत ‘जय हिंद’ या शब्दाने त्यांचे स्वागत करीत राष्ट्रीय भावनेला बळकटी देण्याचा या शासकीय विमान कंपनीचा उद्देश असेल.एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अश्विनी लोहानी यांनी अलीकडेच फ्लाईट कमांडर्सना उद्देशून पाठविलेल्या शब्दांत ‘जय हिंद’ हा शब्द वापरण्याबाबत उल्लेख केला आहे. कमांडर्सनी प्रवाशांशी सातत्याने जोडले राहावे. पहिल्यांदा संवाद साधताना जय हिंदने सुरुवात केली तर त्याचा चांगला प्रभाव पडू शकेल, असे लोहानी यांनी नमूद केले. लोहानी यांनी नुकसानीत असलेल्या एअर इंडियाची नफा कमावण्याच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. विमान कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत सभ्यतेने वागावे. चेहरा हसतमुख असावा. प्रवाशांना एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना चांगला अनुभव यावा यासाठी खबरदारी घेतली जावी, अशी सूचनाही लोहानी यांनी दीर्घ पत्रात केली आहे. (वृत्तसंस्था) 

विलंब आणि गैरसोयीमुळे प्रतिमेवर परिणाम... अलीकडे एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना वाईट अनुभव येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: अपंगांना होणारा त्रास किंवा अन्नाचा निकृष्ट दर्जा, कर्मचाऱ्यांमधील भांडणांतून होणाऱ्या विलंबामुळे या विमान कंपनीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. विमान कर्मचारी उड्डाणाच्या वेळी आणि उतरताना ‘नमस्कार’ हा शब्द पारंपरिकरीत्या वापरत आले आहेत. या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांसोबत वाद न घालता किंवा कोणताही त्रागा न करता चेहऱ्यावर हसू ठेवत सभ्यतेची वागणूक द्यावी. आवाजात गोडवा असावा, असे लोहानी यांना वाटते.

अर्ध्या तासापेक्षा जास्त विलंब नको... विमान धावपट्टीवर असताना (एओजी) अर्ध्या तासापेक्षा विलंब होत असल्यास विमानतळ व्यवस्थापक किंवा स्थानक व्यवस्थापकाने तातडीने घटनास्थळी जाऊन प्रवाशांना त्याबाबत माहिती द्यावी. प्रवाशांसोबत पुरेसा सुसंवाद साधतानाच त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेची विनाविलंब काळजी घेतली जावी. प्रवाशांच्या समस्या सोडवताना या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन अवलंबावा, असेही लोहानी यांनी संदेशात नमूद केले आहे.