शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वी नववधूने घातली अजब अट, ऐकून थक्क झाले सासरचे!

By admin | Updated: January 6, 2017 18:23 IST

लग्नापूर्वी सर्वसाधारणपणे नवरा मुलगा आणि त्याच्या घरची मंडळी वधुपक्षासमोर मागण्या आणि अटी घालत असतात.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 6 - लग्नापूर्वी सर्वसाधारणपणे नवरा मुलगा आणि  त्याच्या घरची मंडळी वधुपक्षासमोर मागण्या आणि अटी घालत असतात. पण मध्य प्रदेशातील भिंड येथील किसीपुरा गावात अशी घटना घडली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  या गावात राहणाऱ्या प्रियांका भदोरिया या तरुणीने आपल्या लग्नापूर्वी सासरच्या मंडळींसमोर अशी अट घातली ज्याची चर्चा सध्या होत आहे. 
त्याचे झाले असे की, सासरची मंडळी जोपर्यंत दहा हजार झाडे लावत नाहीत तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी अजब अट सासरच्या मंडळींसमोर घालली. प्रियांकाची ही अट ऐकून सासरच्यांना ही बाब थोडी विचित्रच वाटली, पण त्यांनी होणाऱ्या सुनबाईंची ही अट मान्य  केली. त्यानंतर प्रियांकाचे धुमधडाक्यात लग्न लावून देण्यात आले. यासंदर्भातील वृत्त न्यूज 24 या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहे. 
 या भागातील प्रथेनुसार लग्नापूर्वी सासरच्यांकडून नववधूला काय हवे हे विचारले जाते. बहुतांश मुली कपडे,  दागदागिन्यांची मागणी करतात. पण प्रियांकाने मात्र यापैकी काहीच न मागता दहा हजार झाडे लावण्याची  मागणी केली.  प्रियांकाला लहानपणापासूनच वृक्षारोपनाची आवड असल्याने तिने अशी मागणी केली. या दहा हजार झाडांपैकी पाच हजार झाडे माहेरी तर पाच हजार झाले सासरी लावण्यात यावीत, अशी तिची इच्छा आहे. देशात वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती पाहता प्रियांकाने केलेल्या या मागणीसारख्या प्रयत्नांची देशाला गरज आहे.