शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

व्हिडीओग्राफीअभावी वधूने मोडले लग्न

By admin | Updated: June 28, 2016 06:09 IST

विवाह ही आयुष्यातील मोठी घटना असते. त्यामुळे लग्नाच्या स्मृती जपून ठेवण्यासाठी ‘व्हिडीओ’ चित्रीकरण करण्यात येते

त्रिची : विवाह ही आयुष्यातील मोठी घटना असते. त्यामुळे लग्नाच्या स्मृती जपून ठेवण्यासाठी ‘व्हिडीओ’ चित्रीकरण करण्यात येते, परंतु याच चित्रीकरणावरून मांडव उठला, तर कोणाला खरे वाटणार नाही, परंतु त्रिचीतील थुरैयार येथे अशी घटना घडली. वरपक्षाने लग्न सोहळ्याचे चित्रीकरणासाठी व्हिडीओग्राफरची व्यवस्था न केल्यामुळे, वधू पक्षाने ऐन वेळी विवाह मोडला व एवढेच नाही, तर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याची तक्रारही दाखल केली. मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे, असा वधूपित्याचा आग्रह होता, तर लग्नसोहळ्यावर जास्त खर्च नको, अशी वरपक्षाची भूमिका होती. मोठ्या मंगल कार्यालयात लग्न लागावे, असे वधूपित्याला वाटत असताना वराकडील मंडळींनी छोटे मंगल कार्यालय निश्चित केले. त्यामुळे वधूकडील मंडळी नाराज झाली होती. मात्र, लग्नाच्या दिवशी व्हिडीओग्राफर दिसत नसल्यामुळे धुसफूस सुरू झाल्यानंतर, वरपक्षाने ऐन वेळी धावपळ करीत एका व्हिडीओग्राफरची सोय केली. तथापि, तो लग्नमंडपात येईपर्यंत अक्षता पडल्या होत्या आणि वर आणि वधू पक्षात जुंपली होती. वधू व वर जवळचे नातेवाईक आहेत, हे विशेष. पाहुण्या मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, विवाह सोहळ्यात सर्व पाहुण्यांसमोर आपल्या पित्याचा अपमान झाल्याचे सांगून, वधूने लग्न मोडल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)>लग्नाची छायाचित्रे काढण्याचे व चित्रीकरण करण्याचे वरपक्षाने कबूल केल्यामुळे वधूकडील मंडळींनी छोट्या मंगल कार्यालयाचा प्रस्ताव मान्य केला होता. मात्र, त्यांनी व्हिडीओग्राफरची व्यवस्था केली नाही.