शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

कोहिनूर परत आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार

By admin | Updated: August 1, 2016 01:42 IST

भारत सरकार १०६ कॅरेटचा कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

नवी दिल्ली : टॉवर आॅफ लंडनमध्ये प्रदर्शनास ठेवण्यात आलेल्या शाही मुकुटातील ‘कोहिनूर’ हिरा परत देण्यास ब्रिटनने कायदेशीर आधाराचा हवाला देत नकार दिला असला तरी भारत सरकार १०६ कॅरेटचा कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.२०० दशलक्ष अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक मूल्य असलेला ‘कोहिनूर हिरा’ ब्रिटिश फौजांनी पंजाबवर कब्जा करून शीख साम्राज्याची संपत्ती जप्त केल्यानंतर लाहोरमधील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या खजिन्यात हस्तांतरित केला होता. एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, भारत सरकार कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी राजनैतिक, तसेच कायदेशीर मार्गाचा विचार करीत आहे. राजनैतिक प्रयत्न सफल झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याची गरज पडणार नाही. मागच्या आठवड्यात ब्रिटनचे आशिया प्रशांत विभागाचे मंत्री आलोक शर्मा यांनी केलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही प्रतिक्रिया दिली आहे. भारताला कोहिनूर पुन्हा कधीच मिळणार नाही, असे संकेत शर्मा यांनी दिले होते. कोहिनूर परत करण्यासाठी कोणताही कायदेशीर आधार नाही, असेही शर्मा म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर भारताने कोहिनूर परत मिळविण्याचा निर्धार केला. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने या हिऱ्यावर दावा करीत मैदानात उडी घेतली. पंजाबचा कोहिनूरवर वैधानिक हक्क आहे. ब्रिटिशांनी कपट करून पंजाबचे शेवटचे शासक महाराजा दलीप सिंह यांच्याकडून कोहिनूर नेला होता, असे पंजाबचे मंत्री दलजित सिंग चीमा यांनी म्हटले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>कोहिनूर हा भावनात्मक मुद्दा राहिला आहे. तो परत आणण्यास सरकारवर राजकीय दबाव वाढल्यानंतर सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी अलीकडेच विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चाही केली होती. प्राप्त माहितीनुसार कोहिनूर हिरा परत आणण्यासाठी पुढच्या महिन्यात ब्रिटनशी संपर्क करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. >सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिरा परत आणण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी चालू आहे. त्यानंतर कोहिनूरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. भारतासह चार देशांनी या हिऱ्यावर दावा केला असून, हा ऐतिहासिक मालकीचा वादग्रस्त विषय आहे.