शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

अर्थसंकल्पातून प्रत्येकाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला

By admin | Updated: February 1, 2017 17:12 IST

आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून शेतकरी, गरीब, ग्रामीण भाग, करदाते, कंपन्या अशा सर्वांसाठीच काही ना

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 1 - आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामधून शेतकरी, गरीब, ग्रामीण भाग, करदाते, कंपन्या अशा सर्वांसाठीच काही ना काही तरतुदी करण्यात आल्या. दरम्यान, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दूरदर्शनच्या डीडी न्यूज या वृत्तवाहिनील दिलेल्या मुलाखतीत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पातून आपण सर्व वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.  
 नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सर्वांनाच या अर्थसंकल्पातून दिलासादायक घोषणांची अपेक्षा होती. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक वर्गातील करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे जेटलींनी सांगितले. तसेच प्रामाणिक करदाते आणि मध्यमवर्गाच्या हातात अधिकाधिक पैसे यावेत हा सरकारचा उद्देश आहे, त्याबरोबरच अधिकाधिक व्यक्ती कराच्या चौकटीत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 
करात सूट दिल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होईल, पण करचोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळून त्याची भरपाई करण्यात येणार असल्याचे जेटलींनी सांगितले.