शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जेएनयूसोबतची वैचारिक लढाई आपण जिंकलो आहोत - अरुण जेटली

By admin | Updated: March 7, 2016 08:31 IST

जवाहलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी आपण वैचारिक लढाई जिंकलो आहोत असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
उत्तरप्रदेश, दि. ७ - जवाहलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) प्रकरणी आपण वैचारिक लढाई जिंकलो आहोत असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बोलले आहेत. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपाखाली विद्यार्थ्यांना अटक करण्यात आले होते त्यांच्याविरोधातील वैचारिक लढाई जिंकलो असल्याचं अरुण जेटली बोलले आहेत. 
 
आपण जिंकलो आहत, ज्यांनी देशविरोधी घोषणा देत देशाचे तुकडे करण्याच्या घोषणा दिल्या होत्या ते आज जय हिंदच्या घोषणा देत आहेत. कारागृहातून सुटका झाल्यावर भारताचा झेंडा फडकवत आहेत. जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याने जेलमधून सुटका झाल्यावर दिलेलं भाषण हा आपला विजय आहे असं अरुण जेटलींनी म्हणलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे. 
 
यावेळी बोलताना अरुण जेटली यांनी काँग्रेसवरदेखील टीका केली. जेएनयूला काँग्रेसने केलेलं समर्थन ही वैचारिक पोकळी आहे. काही लोकांना याकुबच्या तर काहींना अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रम करायचे आहे. काँग्रेसचा नेता त्यांचं समर्थन करतो हे देशाचं दुर्देव असल्याचं म्हणत अरुण जेटलींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींवर टीका केली आहे.डावे  पक्ष लोकशाही विरोधी असल्याची टीकाही अरुण जेटली यांनी केली आहे.