शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आमच्यात नाही तुमच्यात बदल झालाय, नितीश कुमारांचा काँग्रेसवर पलटवार

By admin | Updated: July 3, 2017 09:11 IST

बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी "एनडीए"चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 3 - बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे (Janata Dal United) राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी  "एनडीए"चे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना समर्थन दिल्यामुळे त्यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे.  मात्र, यासंदर्भात नितीशकुमार यांनी आपली ""मन की बात"" सर्वांसमोर ठेवली.  
 
नितीशकुमार म्हणाले की,  ""मी लालू प्रसाद यादव यांच्या दबावाखालीही नाहीय तसंच मी भाजपाच्याही जवळ नाही. माझ्याबाबत बरेच काही बोलले जात आहे, अनुमान लावले जात आहेत. या सर्व गोष्टी निरर्थक आहेत.  मी केवळ बिहारच्या राजकारणात राहून येथील विकासासाठी काम करत राहणार, हाच माझा संकल्प आहे. बिहारमध्ये आम्ही स्वतःचे स्थान बळकट करत आहोत. बाहेरील राजकारणाबाबत अद्याप विचार केलेला नाही. केवळ घोषणाबाजी केल्यानं कुणी पंतप्रधान होत नाही"". 
यावरुन येथील महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रीय जनता दल-जदयूच्या नात्यात दुरावा आला असून जदयू-भाजपाची जवळीक वाढत असल्याच्या चर्चा देशातील राजकारणात रंगत आहेत. पुढे  ते असेही म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत भाजपाची कोणतीही भूमिका नाही. मात्र  तरीही सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात आहेत. 
 
उत्तर देणं मलाही येतं पण...
नितीश कुमार असेही म्हणाले की, रामनाथ कोविंद यांना समर्थन दर्शवल्यानंतर अनेक आरोप करण्यात आले. मला यावर उत्तर देता येत नाही का?. मात्र युतीमुळे गप्प आहे. कोविंद यांनी चहापानासाठी बोलावले होते. ही बाब मी लालू प्रसाद यादव व अशोक चौधरी यांना सांगितली होती. त्यानंतर मी राजभवनात गेलो. मला तर 22 जून रोजी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत सहभागी व्हायचे होते मात्र पाटणामध्ये इफ्तार पार्टीदरम्यान गुलाम नबी आझाद काय-काय बोलले? या कारणामुळे मी गेलो नाही.
 
तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मी तत्त्वांसोबत तडजोड करु शकत नाही. उगाचच गोड-गोड बोलणारा मी नाही. जे होणार आहे, ते होणारच. मी काम करण्यावर विश्वास ठेवतो, असे सांगत नितीश कुमार यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. पुढे ते काँग्रेस पार्टीला उद्देशून असेही म्हणाले की, त्यांना कोणासोबत भिडायला हवे आहे आणि ते भिडत कुणाशी आहेत. माझ्या तत्त्वांत नाही, तुम्ही (काँग्रेस) बदलत आहात.