शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

देशातील ४०हून अधिक बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 03:16 IST

ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे

नवी दिल्ली : ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ‘निहाली’या बोलीभाषेचाही यात समावेश आहे.जनगणना संचालनालयाच्या अहवालानुसार प्रत्येकी एक लाख किंवा त्याहून अधिक लोक दैनंदिन व्यवहारात वापर करतात अशा भारतात राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ व परिशिष्टात समावेश नसलेल्या १०० हून अधिक भाषा व बोलीभाषा आहेत.गृह मंत्रालयाच्या अधिकाºयांनुसार यापैकी ४२ भाषा व बोलीभाषांचा दैनंदिन व्यवहारात वापर करणाºयांची संख्या १० हजारांहून कमी असलयने या भाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे मानले जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘युनेस्को’नेही भारतामधील ४२ भाषा नष्ट होण्याचा धोका असल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.भाषांच्या संवर्धनाचे म्हैसूरमध्ये कामम्हैसूर येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन लॅग्वेजेस’ मध्येकेंद्र सरकारच्या एका योजनेनुसार नष्टतेच्या मार्गावर असलेल्या भारतीय भाषांचे जतन व संवर्धन करण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार, अशा भाषांचे व्याकरण, बहुभाषिक शब्दकोश, या भाषांचा लोकसाहित्यांत वापर आणि भाषिक ज्ञानकोष तयार करण्याचे काम तेथे केले जात आहे.नष्ट होण्याचा धोका असलेल्या भाषाग्रेट अंदमानीज, जारवा, लॅमाँंग्से, ल्युरो, मुओत, ओंगे, पु, सानेन्यो, सेंटिलिज, शॉम्पेन आणि ताकाहानयिलांग (अंदमान व निकोबार बेटे), आयमो, आका, कोयरेन, लामगांग, लांगराँग, पुरुम व ताराओ (मणिपूर), बघाती, हांदुरी, पांगवली व सिरमौडी (हिमाचल प्रदेश), मंडा, परजी व पेंगो (ओडिशा), कोराबा आणि कुरुगा (कर्नाटक), गडाबा आणि नाईकी (आंध्र प्रदेश), कोटाव तोडा (तमिळनाडू), म्रा व ना (अरुणाचल प्रदेश), ताई नोरा व ताई रोंग (आसाम), बांगानी (उत्तराखंड), बिरहोर (झारखंड), नि६ाली (महाराष्ट्र), रुगा (मेघालय) आणि तोटो (प. बंगाल).२२ भाषा सर्वाधिक बोलल्या : राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ भाषांखेरीज आणखी ३१भाषांना विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्यभाषेचा दर्जा आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बोलल्या जाणाºया २२ प्रमुख भाषा आहेत. त्याखेरीज अन्य १,६३५ भाषा विविध समाजांच्या मातृभाषा आहेत.