शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

आज दुपारनंतर होणार पाणीपुरवठा अखेर दुरुस्ती पूर्ण : शुक्रवारी उशीरा झाला पाणीपुरवठा; नागरिकांचे प्रचंड हाल

By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमधील रेणूका हॉस्पिटलसमोर लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मंगळवार, ८ रोजी दुपारी हाती घेतल्याने ९ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले होेते. गळती दुरुस्तीचे काम ३० तास सुरू राहणार होते. त्यामुळे ९ रोजीचा पाणीपुरवठा १० रोजी तर १० रोजीचा पाणीपुरवठा ११ रोजी होईल, असे जाहीर करण्यात आले ह ोते. मात्र गळती दुरुस्ती ठरलेल्या वेळेत होऊनही तेथील व्हॉल्व खराब झाल्याने तो उघडूच शकला नाही. त्यामुळे तो व्हॉल्व अखेर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येऊन थेट पाईप जोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम शुक्रवारी दुपारी १२ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर उमाळे येथील एमबीआरमधून पाणी सोडण्यात आले. ते पाणी गिरणा टाकीपर्यंत पोहोचायला दोन-अडीच तास लागले. त्यानंतर गिरणा टाकी भरण्यात आली. तसेच त्यावरून इतर टाक्या भरून पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार ९ रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात ११ रोजी उशीराने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच १० रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात १२ रोजी दुपारी उशीराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे.

इन्फो-
पर्यायी व्यवस्थेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष
वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम व्हॉल्वच्या बिघाडामुळे लांबल्याने ७ रोजी पाणीपुरवठा झालेल्या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. तर काही भागांमध्ये तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. मनपा प्रशासनाने मात्र पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करण्याची वेळ आली आहे.