शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आज दुपारनंतर होणार पाणीपुरवठा अखेर दुरुस्ती पूर्ण : शुक्रवारी उशीरा झाला पाणीपुरवठा; नागरिकांचे प्रचंड हाल

By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमधील रेणूका हॉस्पिटलसमोर लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मंगळवार, ८ रोजी दुपारी हाती घेतल्याने ९ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले होेते. गळती दुरुस्तीचे काम ३० तास सुरू राहणार होते. त्यामुळे ९ रोजीचा पाणीपुरवठा १० रोजी तर १० रोजीचा पाणीपुरवठा ११ रोजी होईल, असे जाहीर करण्यात आले ह ोते. मात्र गळती दुरुस्ती ठरलेल्या वेळेत होऊनही तेथील व्हॉल्व खराब झाल्याने तो उघडूच शकला नाही. त्यामुळे तो व्हॉल्व अखेर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येऊन थेट पाईप जोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम शुक्रवारी दुपारी १२ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर उमाळे येथील एमबीआरमधून पाणी सोडण्यात आले. ते पाणी गिरणा टाकीपर्यंत पोहोचायला दोन-अडीच तास लागले. त्यानंतर गिरणा टाकी भरण्यात आली. तसेच त्यावरून इतर टाक्या भरून पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार ९ रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात ११ रोजी उशीराने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच १० रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात १२ रोजी दुपारी उशीराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे.

इन्फो-
पर्यायी व्यवस्थेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष
वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम व्हॉल्वच्या बिघाडामुळे लांबल्याने ७ रोजी पाणीपुरवठा झालेल्या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. तर काही भागांमध्ये तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. मनपा प्रशासनाने मात्र पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करण्याची वेळ आली आहे.