शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: सर्वात मोठी बातमी! भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली घोषणा
2
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
3
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
4
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
5
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
6
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
7
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
8
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
9
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
10
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
11
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
12
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
13
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
14
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
15
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
16
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
17
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
18
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
19
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
20
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती

आज दुपारनंतर होणार पाणीपुरवठा अखेर दुरुस्ती पूर्ण : शुक्रवारी उशीरा झाला पाणीपुरवठा; नागरिकांचे प्रचंड हाल

By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमधील रेणूका हॉस्पिटलसमोर लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मंगळवार, ८ रोजी दुपारी हाती घेतल्याने ९ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले होेते. गळती दुरुस्तीचे काम ३० तास सुरू राहणार होते. त्यामुळे ९ रोजीचा पाणीपुरवठा १० रोजी तर १० रोजीचा पाणीपुरवठा ११ रोजी होईल, असे जाहीर करण्यात आले ह ोते. मात्र गळती दुरुस्ती ठरलेल्या वेळेत होऊनही तेथील व्हॉल्व खराब झाल्याने तो उघडूच शकला नाही. त्यामुळे तो व्हॉल्व अखेर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येऊन थेट पाईप जोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम शुक्रवारी दुपारी १२ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर उमाळे येथील एमबीआरमधून पाणी सोडण्यात आले. ते पाणी गिरणा टाकीपर्यंत पोहोचायला दोन-अडीच तास लागले. त्यानंतर गिरणा टाकी भरण्यात आली. तसेच त्यावरून इतर टाक्या भरून पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार ९ रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात ११ रोजी उशीराने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच १० रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात १२ रोजी दुपारी उशीराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे.

इन्फो-
पर्यायी व्यवस्थेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष
वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम व्हॉल्वच्या बिघाडामुळे लांबल्याने ७ रोजी पाणीपुरवठा झालेल्या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. तर काही भागांमध्ये तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. मनपा प्रशासनाने मात्र पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करण्याची वेळ आली आहे.