शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाला हवे अतिरिक्त मनुष्यबळ महापालिका : ४४० कर्मचार्‍यांची मागणी

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्राम, वाहनतळे, भाविक मार्ग यांसह नाशिक शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे; परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने सिंहस्थपर्वकाळात नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची मोठी कसोटी लागणार आहे. विभागाने महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त तब्बल ४४० मनुष्यबळाची मागणी केली आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्राम, वाहनतळे, भाविक मार्ग यांसह नाशिक शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे; परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने सिंहस्थपर्वकाळात नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची मोठी कसोटी लागणार आहे. विभागाने महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त तब्बल ४४० मनुष्यबळाची मागणी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळाला मंगळवार, दि. १४ जुलैपासून प्रारंभ होत आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेचा बांधकाम, पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य व वैद्यकीय विभाग आपल्या स्तरावर नियोजनात गुंतला असून, विभागांनी त्यांना हव्या असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. शासनानेही १४ जुलैच्या आत प्रतिनियुक्तीवर कर्मचारी उपलब्ध करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने शासनाच्या अन्य विभागांकडे मागणी नोंदविलेली आहे. सिंहस्थात पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवेची मोठी जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर असणार आहे. महापालिकेमार्फत तपोवनातील साधुग्राममध्ये पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. त्यासाठी स्वतंत्र तीन जलकंुभांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेमार्फत पेठरोड, दिंडोरीरोड व आडगाव या तीन ठिकाणी बा‘ वाहनतळे उभारण्यात येत असून, त्याठिकाणी ४८ पीव्हीसी पाण्याच्या टाक्या आणि ३९२ स्टॅण्डपोस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महामार्ग बसस्थानक, सिन्नर फाटा मार्केट यार्ड, सातपूर बसस्थानक, निलगिरी बाग, पंचवटी स्टेडियम, पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार मार्केट या अंतर्गत वाहनतळांवरही सुमारे ५२ पाण्याच्या टाक्या, तसेच २५८ स्टॅण्डपोस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविक मार्गांवरही पाणीपुरवठ्याची सोय राहणार आहे. या सर्व पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी ४४० अतिरिक्त कर्मचार्‍यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.