शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
2
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
3
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
4
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
6
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
7
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
8
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
9
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
10
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
11
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
12
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
13
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
14
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
15
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
16
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
17
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
18
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
19
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
20
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 

पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांची मालकी आता पाणीपुरवठा विभागाकडे * आरोग्य विभागाचे पंख छाटले * १ जानेवारीपासून ३४ जिल्हा अन् १४८ उपविभागिय प्रयोगशाळा येणार

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

नारायण जाधव

नारायण जाधव
ठाणे- आधीच पाणीटंचाईने होरपळणार्‍या महाराष्ट्रातील हजारो गावांत पिण्याचे पाणी दूषीत आढळले आहे़ ज्या गावांतील पाणीनुमने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळांत पाठविण्यात येतात, त्याचे अहवाल संबधित आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या पाणी गुणवत्ता तपाससी प्रयोगशाळांमधून उशिरा येऊ लागल्याने पाणीपुरवठा विभागास उपाययोजना करणे कठीण झाले आहे़ याबाबत सर्वत्र टीकेचा सूर निघू लागल्याने या प्रयोगशाळांसह तेथील कंत्राटी कामगार आणि साधनसामग्री पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रणासाखाली आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ राज्यात ३४ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, १३८ उपविभागिय प्रयोगशाळा असून आणखी १० उपविभागिय प्रयोगशाळांचे काम प्रगतीपथावर आहे़ यासर्वांचा कारभार १ जानेवारी २०१५ पासून आता आरोग्य विभागाकडून पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली येणार आहे़
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणार्‍या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर खर्च करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणीपुरवठा विभाग नित्यनियमाने आरोग्य विभागाकडे सुपूर्द करतो़ आपल्या ग्रामीण रूग्णालयांच्या आवारात असलेल्या प्रयोगशाळांवर आरोग्य विभाग तो खर्च करतो़ परंतु, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागात योग्य तो समन्वय राखला जात असल्याने राज्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरविणे पाणीपुरवठा विभागास कठीण होऊन बसले आहे़ आरोग्य विभागाकडून होणार्‍या दिरंगाईसह विषबाधेच्या घटनांमुळे पाणीपुरवठा विभागास टीकेचे धनी व्हावे लागत आहे़ कारण राज्यात हजारो गावांत पाणीटंचाई असून अनेक ठिकाणी विहीरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे़ त्यामुळे तेथील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी पाणीपुरवठाकडे आहे़ या विभागाचे कर्मचारी अधूनमधून गावांगावातील पिण्याचे पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांमध्ये पाठवितात़ शिवाय वाढत्या औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळेही राज्यातील नद्या, तलावांसह इतर जलसाठे प्रदूषित झाले आहेत़ त्यांचे पाणी तपासण्याची जबाबदारीही पाणीपुरवठा विभाग या प्रयोगशाळांच्या माध्यमातून करतो़ अलिकडच्या काळात विभागाने राज्यातील अनेक प्रयोगशाळांचे बळकटीकरण केले आहे़ काहींचे काम प्रगतीपथावर आहे़ यावर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत़ मात्र, तरीही आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभागात या प्रयोगशाळांतच्या बाबतीत योग्य समन्वय राखून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जात नाही़ यामुळे सर्व पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांसह तेथील रसायनी व डाटा एंट्री ऑपरेटर सारखे कंत्राटी मनुष्यबळ व साधनसामग्री १ जानेवारी २०१५ पासून एकाच छत्राखाली आणून पाणीपुरवठा विभागाच्या अखात्यारीत आणण्यात येणार आहे़