शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांची मालकी आता पाणीपुरवठा विभागाकडे * आरोग्य विभागाचे पंख छाटले * १ जानेवारीपासून ३४ जिल्हा अन् १४८ उपविभागिय प्रयोगशाळा येणार

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

नारायण जाधव

नारायण जाधव
ठाणे- आधीच पाणीटंचाईने होरपळणार्‍या महाराष्ट्रातील हजारो गावांत पिण्याचे पाणी दूषीत आढळले आहे़ ज्या गावांतील पाणीनुमने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळांत पाठविण्यात येतात, त्याचे अहवाल संबधित आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या पाणी गुणवत्ता तपाससी प्रयोगशाळांमधून उशिरा येऊ लागल्याने पाणीपुरवठा विभागास उपाययोजना करणे कठीण झाले आहे़ याबाबत सर्वत्र टीकेचा सूर निघू लागल्याने या प्रयोगशाळांसह तेथील कंत्राटी कामगार आणि साधनसामग्री पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रणासाखाली आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ राज्यात ३४ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, १३८ उपविभागिय प्रयोगशाळा असून आणखी १० उपविभागिय प्रयोगशाळांचे काम प्रगतीपथावर आहे़ यासर्वांचा कारभार १ जानेवारी २०१५ पासून आता आरोग्य विभागाकडून पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली येणार आहे़
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळणार्‍या एकूण निधीपैकी ३ टक्के निधी या प्रयोगशाळांवर खर्च करण्यात येतो़ दरवर्षी हा निधी पाणीपुरवठा विभाग नित्यनियमाने आरोग्य विभागाकडे सुपूर्द करतो़ आपल्या ग्रामीण रूग्णालयांच्या आवारात असलेल्या प्रयोगशाळांवर आरोग्य विभाग तो खर्च करतो़ परंतु, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागात योग्य तो समन्वय राखला जात असल्याने राज्यातील नागरिकांना शुद्ध पाणी पुरविणे पाणीपुरवठा विभागास कठीण होऊन बसले आहे़ आरोग्य विभागाकडून होणार्‍या दिरंगाईसह विषबाधेच्या घटनांमुळे पाणीपुरवठा विभागास टीकेचे धनी व्हावे लागत आहे़ कारण राज्यात हजारो गावांत पाणीटंचाई असून अनेक ठिकाणी विहीरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खोलवर गेली आहे़ त्यामुळे तेथील पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी पाणीपुरवठाकडे आहे़ या विभागाचे कर्मचारी अधूनमधून गावांगावातील पिण्याचे पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांमध्ये पाठवितात़ शिवाय वाढत्या औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळेही राज्यातील नद्या, तलावांसह इतर जलसाठे प्रदूषित झाले आहेत़ त्यांचे पाणी तपासण्याची जबाबदारीही पाणीपुरवठा विभाग या प्रयोगशाळांच्या माध्यमातून करतो़ अलिकडच्या काळात विभागाने राज्यातील अनेक प्रयोगशाळांचे बळकटीकरण केले आहे़ काहींचे काम प्रगतीपथावर आहे़ यावर कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत आहेत़ मात्र, तरीही आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभागात या प्रयोगशाळांतच्या बाबतीत योग्य समन्वय राखून त्यांच्यावर नियंत्रण ठेवले जात नाही़ यामुळे सर्व पाणी गुणवत्ता प्रयोगशाळांसह तेथील रसायनी व डाटा एंट्री ऑपरेटर सारखे कंत्राटी मनुष्यबळ व साधनसामग्री १ जानेवारी २०१५ पासून एकाच छत्राखाली आणून पाणीपुरवठा विभागाच्या अखात्यारीत आणण्यात येणार आहे़