शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पलाइनवर पाणी गळतीच्या तक्रारींचा ओघ सुरूच गळतीमुळे मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी :

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पुणे : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर पाणीकपात, गैरवापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती व गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास माहिती देण्यासाठी पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सोमवारपर्यंत ९४ तक्रारींची नोंद झालेली आहे.

पुणे : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर पाणीकपात, गैरवापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती व गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास माहिती देण्यासाठी पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सोमवारपर्यंत ९४ तक्रारींची नोंद झालेली आहे.
पाणी गळती होत असल्याचे तसेच गैरवापर होत असल्याची तक्रार ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या ४ दिवसांपासून नागरिकांकडून अनेक तक्रार नोंदविल्या जात आहेत. पाणी गळतीच्या तक्रारी मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये कोथरुड, कर्वेनगर, वारजे, धनकवडी, बालाजीनगर, अप्पर इंदिरानगर, भारती विद्यापीठ परिसरातून नोंदविल्या जात आहेत. त्याचबरोबर अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याच्या, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्याच्या, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर सुरू असल्याच्याही तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार तातडीने पाणीगळती रोखण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयामध्ये हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतर ती रजिस्टरमध्ये नोंदवून घेतली जाते. त्यानंतर लगेच संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये फोन करून भरारी पथक पाठविण्याची सुचना केली जाते. हेल्पलाइनवरून आलेल्या तक्रारी नुसार भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे. पाण्याचा गैरवापर होताचे आढळून आल्यास नागरिकांकडून दंड वसूल करण्याबरोबरच त्यांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी गळती होत असल्याचे आढळून आल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांवर काय कारवाई करणार अशी विचारणा केली जात आहे.


चौकट
भरारी पथकांकडून कारवाईच नाही
आयुक्त कुणाल कुमार यांनी पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास, रस्त्यावर पाणी सांडले जात असल्यास, वॉशिंग सेंटर सुरू असल्यास कोणत्या अधिकार्‍यांनी देखरेख ठेवायची याच्याही सुचना केल्या आहेत. मात्र अद्याप या भरारी पथकांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.