शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

हेल्पलाइनवर पाणी गळतीच्या तक्रारींचा ओघ सुरूच गळतीमुळे मोठयाप्रमाणात पाण्याची नासाडी :

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

पुणे : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर पाणीकपात, गैरवापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती व गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास माहिती देण्यासाठी पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सोमवारपर्यंत ९४ तक्रारींची नोंद झालेली आहे.

पुणे : शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर पाणीकपात, गैरवापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आदी उपाययोजना केल्या जात आहेत. पाणी गळती व गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास माहिती देण्यासाठी पालिकेच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर मोठया प्रमाणात तक्रारी येत आहेत. सोमवारपर्यंत ९४ तक्रारींची नोंद झालेली आहे.
पाणी गळती होत असल्याचे तसेच गैरवापर होत असल्याची तक्रार ०२०-२५५०१३८३/२५५०१३८६ या क्रमांकावर करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या ४ दिवसांपासून नागरिकांकडून अनेक तक्रार नोंदविल्या जात आहेत. पाणी गळतीच्या तक्रारी मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये कोथरुड, कर्वेनगर, वारजे, धनकवडी, बालाजीनगर, अप्पर इंदिरानगर, भारती विद्यापीठ परिसरातून नोंदविल्या जात आहेत. त्याचबरोबर अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याच्या, वॉशिंग सेंटरमध्ये पाण्याचा वापर सुरू असल्याच्या, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर सुरू असल्याच्याही तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनुसार तातडीने पाणीगळती रोखण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्हि. जी. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयामध्ये हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतर ती रजिस्टरमध्ये नोंदवून घेतली जाते. त्यानंतर लगेच संबंधित क्षेत्रिय कार्यालयामध्ये फोन करून भरारी पथक पाठविण्याची सुचना केली जाते. हेल्पलाइनवरून आलेल्या तक्रारी नुसार भरारी पथकांकडून कारवाई केली जात आहे. पाण्याचा गैरवापर होताचे आढळून आल्यास नागरिकांकडून दंड वसूल करण्याबरोबरच त्यांचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणी गळती होत असल्याचे आढळून आल्यास अधिकारी व कर्मचार्‍यांवर काय कारवाई करणार अशी विचारणा केली जात आहे.


चौकट
भरारी पथकांकडून कारवाईच नाही
आयुक्त कुणाल कुमार यांनी पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करून कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यास, रस्त्यावर पाणी सांडले जात असल्यास, वॉशिंग सेंटर सुरू असल्यास कोणत्या अधिकार्‍यांनी देखरेख ठेवायची याच्याही सुचना केल्या आहेत. मात्र अद्याप या भरारी पथकांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.