शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने पाणी बिल

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

जलप्रदाय विभाग : विभागाची जबाबदारी कुणावर?नागपूर : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. यावर महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे नियंत्रण असल्याने पाणी बिल विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने पाठविली जातात. परंतु विभागाचे कार्यकारी अभियंता अजीजूर रहेमान ३१ जानेवारी २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले असतानाही फेब्रुवारी ...


जलप्रदाय विभाग : विभागाची जबाबदारी कुणावर?
नागपूर : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. यावर महापालिकेच्या जलप्रदाय विभागाचे नियंत्रण असल्याने पाणी बिल विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या स्वाक्षरीने पाठविली जातात. परंतु विभागाचे कार्यकारी अभियंता अजीजूर रहेमान ३१ जानेवारी २०१५ रोजी सेवानिवृत्त झाले असतानाही फेब्रुवारी महिन्यात त्यांच्याच स्वाक्षरीने ग्राहकांना पाणी बिल पाठविली जात आहेत.
नगरयंत्री एस.एस.गायकवाड यांच्यकडे जलप्रदाय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे लोकनिर्माण विभाग, ई-गव्हर्नन्स तसेच विविध प्रकल्पांची जबाबदारी आहे. अतिरिक्त प्रभार म्हणजे १० टक्के जबाबदारी सांभाळणे असा लावला जातो. वास्तविक जलप्रदाय विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंत्याची गरज आहे.
गायकवाड यांच्याकडे अनेक विभागाची जबाबदारी असल्याने त्यांना जलप्रदाय विभागाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यातच त्यांनी हृदय शस्त्रक्रिया केली आहे. त्यामुळे जलप्रदाय विभागात अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
चौकट...
चार अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
मनपाचे उपअभियंता दिलीप जामगडे, वासुदेव गदरे, विजय गभने व बाराहाते आदी जलप्रदाय विभागाची जबाबदारी सांभाळू शकतात. तूर्त या सर्वांकडे महत्त्वाची जबाबदारी नसल्याने त्यापैकी एकाची या विभागात बदली होणार असल्याची चर्चा आहे.