शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

'ओवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होतायत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 16:14 IST

रिझवी कायमच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात.  याआधी त्यांनी बरेली येथे तौकीर रजा यांच्या वक्तव्यावर त्यांना नामर्द म्हटले होते. सध्या ते नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध होणाऱ्या आंदोलनावर कडाडून टीका करत आहेत. 

नवी दिल्ली - पाकिस्तानातून पूर्वी भारतात कसाब पाठवण्यात यायचे. आता मात्र ओवेसी सारख्या व्हायरसने भारतात कसाब तयार करण्यात येत असल्याची घणाघाती टीका शिया सेंट्रल बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली आहे. रिझवी यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन करताना ही टीका केली. 

रिझवी यांनी शाहीन बाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावरही हल्लाबोल केला. शाहीन बाग येथे सुरू असलेले आंदोलन हक्क मागण्यासाठी नसून हिंदूंचा हक्क हिसकावण्यासाठी आहे. पाकिस्तानातून पूर्वी भारतात कसाब पाठविण्यात यायचे, आता ओवेसी व्हायरस येथेच कसाब तयार करत असल्याची टीका रिझवी यांनी केली.

देशात शाहीन बाग सारखीच स्थिती राहिली तर, इस्लामीक दाढी ठेवण्याची पद्धत आणि मिशा काढून फिरणारे चेहरे भारताच्या गंगा, यमुना संस्कृतीला नष्ट करून टाकतील. त्यामुळे शाहीन बाग सारखे हजारो आंदोलने झाले तरी बेहत्तर पण नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यासाठी माघार घेऊ नये, अशी इच्छा रिझवी यांनी व्यक्त केली.

रिझवी कायमच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात.  याआधी त्यांनी बरेली येथे तौकीर रजा यांच्या वक्तव्यावर त्यांना नामर्द म्हटले होते. सध्या ते नागरिकता संशोधन कायद्याविरुद्ध होणाऱ्या आंदोलनावर कडाडून टीका करत आहेत.