शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

हिंदू राष्ट्रवादामुळे युद्धजन्य परिस्थिती; चीनचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:37 IST

भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असून, त्यामुळे चीन व भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून

बीजिंग : भारतात हिंदू राष्ट्रवाद वाढत असून, त्यामुळे चीन व भारत यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप ग्लोबल टाइम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ग्लोबल टाइम्स, अन्य सरकारी वृत्तपत्रे तसेच सरकारच्या मालकीच्या टीव्ही चॅनलमधून भारतावर सतत टीका केली जात आहे आणि त्यामार्गे भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारात हिंदू राष्ट्रवादाचा इंधन म्हणून वापर केला असून, ते सत्तेत आल्यापासून भारतात मुस्लिमांवरील हिंसाचाराच्या घटनांत वाढ झाली आहे, असे नमूद करीत हिंदू राष्ट्रवाद वाढल्यानेच भारत व चीन यांच्यात युद्धाची शक्यता बळावली आहे, असे ग्लोबल टाइम्समधील लेखात म्हटले आहे. हिंदू राष्ट्रवादामुळे भारताची युद्धाकडे वाटचाल सुरू आहे. राजधघनी दिल्लीतील परराष्ट्रविषयक सल्लागार, नेते व रणनीती आखणारे चीनविषयीचे भारताचे धोरण बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. पण चीनच्या तुलनेत भारताचे सामर्थ्य खूपच कमी आहे, असा उल्लेख लेखात आहे. डोकलाममधून भारताने आपले लष्कर मागे घ्यावे, असे चीन सातत्याने भारताला सांगत आहे. तरीही आपल्या सैन्याला माघारी न बोलावण्यास भारताची हीच रणनीती कारणीभूत आहे, असा आरोप या लेखात करण्यात आला आहे. तिबेटची मदत सुरू राहू द्यालोकशाही आणि मानवाधिकार टिकवून ठेवण्यासाठी त्या देशाला चीनचा भाग असलेल्या तिबेटला पूर्वीप्रमाणे अर्थसाह्य करण्यात यावे, असे मत तेथील डेमॉक्रेटिक पार्टीच्या सदस्यांनीही व्यक्त केले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे साह्य न करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्या पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलॉसी यांनी चिंता व्यक्त केली आहे.माघार हाच मार्गडोकलाममधून आपले सैनिक मागे घेणे हाच एकमेव मार्ग भारतापुढे आहे. अन्यथा त्या सैनिकांना ताब्यात घेतले जाईल वा ते मारले जातील, असे चीनचे भारतातील माजी वाणिज्यदूत लियो युवफा यांनी म्हटले आहे. युवफा हे मुंबई वाणिज्य कार्यालयात होते.मला जो आंतरराष्ट्रीय कायदा समजतो, त्याप्रमाणे लष्करी वेषातील व्यक्ती अन्य राष्ट्राच्या सीमेत घुसते, तेव्हा त्या व्यक्तीस शत्रू मानून ताब्यात घेतले जाते वा मारले जाते. त्यामुळे अशा स्थितीत माघार घेणे हाच मार्ग असतो, असे त्यांनी म्हटले आहे.अमेरिकेची टीकावॉशिंग्टन : सतत कुरापती काढण्याची सवय असलेल्या चीनच्या सध्याच्या विस्तारवादी भूमिकेवर अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीच्या संसद सदस्यांनी टीका केली आहे. अन्य राष्ट्रांच्या सीमांबाबतही चीन वाद निर्माण करीत आहे, याचा उल्लेख त्यांनी केला आहे.