शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी नाकारणाऱ्या आधार केंद्रांना इशारा

By admin | Updated: July 5, 2017 00:47 IST

आधार नोंदणी केंद्रांकडून तांत्रिक कारण देऊन नोंदणी नाकारण्याचे प्रकार वाढत असून, या प्रकरणी आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने अशा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आधार नोंदणी केंद्रांकडून तांत्रिक कारण देऊन नोंदणी नाकारण्याचे प्रकार वाढत असून, या प्रकरणी आधार प्राधिकरण ‘यूआयडीएआय’ने अशा सर्व केंद्रांना गंभीर इशारा दिला आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन आधार नोंदणी नाकारणे ‘भ्रष्ट कृत्य’ म्हणून गृहीत धरले जाईल, असे यूआयडीएआयने म्हटले आहे.आधार प्राधिकरणाचे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले की, नोंदणी केंद्रचालकांना परवान्याचे दर १0 दिवसांनी नूतनीकरण करून घ्यावे लागते. सेवा देण्यास पात्र असल्याचे प्रमाणित करून घ्यावे लागते, अशा स्थितीत तांत्रिक बिघाडाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तांत्रिक बिघाडाचे कारण देणे म्हणजे केंद्राची पात्रता नाही हे मान्य करणे आहे. त्यामुळे अशा प्रकारे तांत्रिक कारण देऊन कोणाही नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकास परत पाठविता येणार नाही.पांडे म्हणाले की, आमच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनेक आधार केंद्रांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. काही ना काही कारणे पुढे करून आधार ही केंद्रे नागरिकांना आधार नोंदणी करण्याचे नाकारत आहेत, अशा प्रकारांना भ्रष्ट कृत्य म्हणून गृहीत धरले जाईल.पांडे यांनी म्हटले की, आधार केंद्रचालक आमच्याकडे स्वत:च्या केंद्राची नोंदणी करतात. तसेच दर १0 दिवसांनी नोंदणी नूतनीकृत करतात. ते जेव्हा नोंदणी करतात, तेव्हा त्यांचे यंत्र काम करीत असून नागरिकांची नोंदणी करण्यास ते सक्षम आहेत, असे गृहीत धरले जाते. असे असताना केंद्रचालक लोकांना नोंदणी न करता परत कसे काय पाठवू शकतात?२५ हजार केंद्रेआधारची नोंदणी करण्यासाठी देशभरात २५ हजार केंद्रे कार्यरत आहेत. सध्या ही आधार केंद्रे चालकांच्या मालकीच्या इमारतीत चालविली जातात. ही केंद्रे येत्या काही आठवड्यांत सरकारी आणि पालिकांच्या इमारतींत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. यापुढे आधार नोंदणी सरकारी कार्यालयांमध्येच केली जाणार आहे. तसे सरकारतर्फे जाहीरही करण्यात आले आहे.