शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 08:34 IST

रेल्वेच्या २३ एकर जमिनीवर उद्यानासाठीही पाठपुरावा

- विकास झाडेनवी दिल्ली : तब्बल १३ वर्षांपासून रखडलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाची सर्व माहिती घेऊन विलंबाची कारणे शोधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांना दिली. त्यामुळे हा प्रकल्प आता ‘फास्ट ट्रॅक’वर येईल.

रखडलेला रेल्वे प्रकल्प व यवतमाळात रेल्वेच्या २३ एकर जमिनीवर उद्यान करण्यात यावे यासाठी दर्डा यांनी प्रकल्प मंजूर झाल्यापासून १३ वर्षांत दहा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची अनेकदा भेट घेतली आणि शेकडो वेळा पत्रव्यवहार केले. आदिवासी, शेतकरी, गरीब व सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनी ठरणारा हा प्रकल्प मार्गी लागावा, म्हणून दर्डा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.     

दर्डा यांनी राज्यसभेतही संसदीय आयुधांचा वापर करून, यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास यावा म्हणून विषय लावून धरले होते. या प्रकल्पात केंद्र सरकारचा ६० टक्के, तर महाराष्ट्र सरकारचा ४० टक्के वाटा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला प्राधान्य देत वॉररूममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना समीक्षा करण्याची सूचना दिली होती; परंतु त्या कामाची गती संथ असल्याचे पत्रही दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. 

नांदेडपासून यवतमाळकडील काही भाग आणि यवतमाळपासून कळंबकडील भागात भूसंपादन अत्यंत संथगतीने सुरू आहे. भूसंपादनाची गती वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्या लागतील, याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले. अश्विनी वैष्णव यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून, प्रकल्प का रखडला, याची सर्व माहिती चौकशी करून सादर करायला सांगितली. या प्रकल्पात आपण लक्ष घालू, त्याला वेग देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यवतमाळच्या जागेवर उद्यान 

यवतमाळ शहरात एकही मोठे उद्यान नाही. येथील रेल्वेच्या २३ एकर जागेवर उद्यान व्हावे आणि यवतमाळच्या जनतेला त्याचा लाभ व्हावा म्हणून विजय दर्डा गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. रेल्वेच्या उद्यानामुळे शहरातील लोकांची चांगली सोय होणार आहे. मात्र या जागेवर सतत अतिक्रमण होत असते. या उद्यानाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी केले होते. मात्र, उद्यान विकसित झाले नसल्याकडे दर्डा यांनी लक्ष वेधताच रेल्वेमंत्री वैष्णव यांनी त्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही जागा विकसित करून तिचा योग्य उपयोग करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVijay Dardaविजय दर्डा