शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 08:34 IST

रेल्वेच्या २३ एकर जमिनीवर उद्यानासाठीही पाठपुरावा

- विकास झाडेनवी दिल्ली : तब्बल १३ वर्षांपासून रखडलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाची सर्व माहिती घेऊन विलंबाची कारणे शोधण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देत रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा प्रकल्प लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांना दिली. त्यामुळे हा प्रकल्प आता ‘फास्ट ट्रॅक’वर येईल.

रखडलेला रेल्वे प्रकल्प व यवतमाळात रेल्वेच्या २३ एकर जमिनीवर उद्यान करण्यात यावे यासाठी दर्डा यांनी प्रकल्प मंजूर झाल्यापासून १३ वर्षांत दहा केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची अनेकदा भेट घेतली आणि शेकडो वेळा पत्रव्यवहार केले. आदिवासी, शेतकरी, गरीब व सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनी ठरणारा हा प्रकल्प मार्गी लागावा, म्हणून दर्डा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला.     

दर्डा यांनी राज्यसभेतही संसदीय आयुधांचा वापर करून, यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास यावा म्हणून विषय लावून धरले होते. या प्रकल्पात केंद्र सरकारचा ६० टक्के, तर महाराष्ट्र सरकारचा ४० टक्के वाटा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला प्राधान्य देत वॉररूममध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना समीक्षा करण्याची सूचना दिली होती; परंतु त्या कामाची गती संथ असल्याचे पत्रही दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. 

नांदेडपासून यवतमाळकडील काही भाग आणि यवतमाळपासून कळंबकडील भागात भूसंपादन अत्यंत संथगतीने सुरू आहे. भूसंपादनाची गती वाढविण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्या लागतील, याकडे दर्डा यांनी लक्ष वेधले. अश्विनी वैष्णव यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून, प्रकल्प का रखडला, याची सर्व माहिती चौकशी करून सादर करायला सांगितली. या प्रकल्पात आपण लक्ष घालू, त्याला वेग देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यवतमाळच्या जागेवर उद्यान 

यवतमाळ शहरात एकही मोठे उद्यान नाही. येथील रेल्वेच्या २३ एकर जागेवर उद्यान व्हावे आणि यवतमाळच्या जनतेला त्याचा लाभ व्हावा म्हणून विजय दर्डा गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करीत आहेत. रेल्वेच्या उद्यानामुळे शहरातील लोकांची चांगली सोय होणार आहे. मात्र या जागेवर सतत अतिक्रमण होत असते. या उद्यानाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी केले होते. मात्र, उद्यान विकसित झाले नसल्याकडे दर्डा यांनी लक्ष वेधताच रेल्वेमंत्री वैष्णव यांनी त्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ही जागा विकसित करून तिचा योग्य उपयोग करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVijay Dardaविजय दर्डा