शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

हे तर शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध

By admin | Updated: June 6, 2017 23:16 IST

महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यातच

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 -  महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पुकारलेला संप आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन यामुळे देशातील वातावरण तापलेले आहे. त्यातच मध्य प्रदेशात मंदासौर जिल्हात काल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर  पोलिसांना गोळीबार केला. या गोळीबारात चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने परिस्थिती अधिकच बिघडली असून, शेतकऱ्यांवर केलेला गोळीबार म्हणजे सरकारने शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्धच आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.  मध्य प्रदेशातील मंदसौरच्या पार्श्वनाथ येथे सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू  झाला होता. दोन जूनपासून मंदसौरमध्ये शेतक-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनादरम्यान, येथील पार्श्वनाथमध्ये काही आंदोलकांकडून वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पांगविण्यासाठी सीआरपीएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरु झाला. यात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चार शेतकरी जखमी झाले असून पाच शेतक-यांचा मृत्यू झाल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या गोळीबाराचा राहुल गांधी यांनी ट्विटरवरून निषेध केला आहे. हे सरकार आपल्याच देशातील शेतकऱ्यांविरोधात युद्ध पुकारत असल्याचे राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल यांच्याबरोबरच मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे. अन्नदात्यावर गोळी चालवणे अत्यंत दु:खद आहे. आजचा दिवस मध्य प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे शिंदेंनी म्हटले आहे.