शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

राष्ट्रपित्याचे स्वप्न पूर्ण करण्याकडे वाटचाल

By admin | Updated: January 31, 2016 00:41 IST

खादीच्या माध्यमाने देशवासीयांना स्वावलंबी बनविण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपले सरकार आगेकूच करीत असून विविध सरकारी आस्थापनांमध्ये

नवी दिल्ली : खादीच्या माध्यमाने देशवासीयांना स्वावलंबी बनविण्याचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने आपले सरकार आगेकूच करीत असून विविध सरकारी आस्थापनांमध्ये खादीच्या उत्पादनांचा वापर केला जात आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मोदी यांच्यासह साऱ्या देशाने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला त्यांना श्रद्धांजली वाहिली. नव्याने स्थापित खादी आणि ग्रामोद्योग आयोग नव्या संधी आणि आव्हाने लक्षात घेऊन अनेक महत्त्वाची पावले उचलित आहे. याअंतर्गत सौर चरखा आणि सौरलूमद्वारे उत्पादनाचा यशस्वी प्रयत्न होत आहेत. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका वठविणारी खादी आज फॅशन झाली असून गावागावात खादी व ग्रामोद्योगाचे जाळे तयार करण्याची सरकारची मनीषा आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. दरम्यान राष्ट्रपती मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी राजघाटवरील बापूंच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर आणि नगरविकास मंत्री एम.वेंकय्या नायडू, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह अन्य नेत्यांचाही यात समावेश होता. नायडू यांच्या हस्ते राजघाटावर कस्तुरबा स्मृती केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाचे उद्घाटन यानिमित्त करण्यात आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)राष्ट्रपित्याच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, बाबुल सुप्रियो, राव इंद्रजीतसिंग, तीनही सेनांचे प्रमुख जनरल दलबिरसिंग, एअर चीफ मार्शल अरुप राहा आणि अ‍ॅडमिरल रॉबिन धवन यावेळी उपस्थित होते. तोफांची सलामी आणि भजनाचा कार्यक्रम झाला. हुतात्मादिनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.