शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

...यांना प्रतीक्षा पुन्हा वृक्षारोपणाची झाडे गायब, केवळ खड्डे बाकी : मेहरूण चौपाटी परिसरात दुर्लक्षाची परिसिमा

By admin | Updated: March 29, 2016 00:25 IST

जळगाव : दरवर्षी या मेहरूण तलाव परिसरात विविध संघटनांचे हौशी कार्यकर्ते वृक्षारोपण करतात पण त्यांच्या संगोपनाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तीच जागा, तेच खड्डे आणि वृक्षारोपण करणार्‍या संघटनांही त्याच अशी प्रचिती येत असते. आताही मेहरूण चौपाटीवरील वृक्षारोपणाचे खड्डे आहे त्याच स्थितीत असून जणू त्यांनाही पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा असल्याचेच या परिसरात दिसून येत आहे.

जळगाव : दरवर्षी या मेहरूण तलाव परिसरात विविध संघटनांचे हौशी कार्यकर्ते वृक्षारोपण करतात पण त्यांच्या संगोपनाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे तीच जागा, तेच खड्डे आणि वृक्षारोपण करणार्‍या संघटनांही त्याच अशी प्रचिती येत असते. आताही मेहरूण चौपाटीवरील वृक्षारोपणाचे खड्डे आहे त्याच स्थितीत असून जणू त्यांनाही पुन्हा वृक्षारोपणाची प्रतीक्षा असल्याचेच या परिसरात दिसून येत आहे.
पक्षांचा मोठा अधिवास लाभलेला, चोहोबाजुंनी निसर्गाचा वेढा असलेल्या मेहरूण तलाव परिसरास जैवविविधता वारसा हक्क स्थळ म्हणून दर्जा मिळावा म्हणून एकीकडे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढतच असल्याची प्रचिती येत आहे.
प्रमुख पर्यटन स्थळ
शहरातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून मेहरूण तलावाची ओळख आहे. विस्तीर्ण परिसर, दाट वनराईमुळे या परिसरात पशुपक्ष्यांचाही मोठ्या प्रमाणात विहार असतो. ब्रिटीश कालीन म्हणजे शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधीपूर्वीचा हा तलाव असल्याचे जुन्या जानकार व्यक्तींकडून सांगिलते जाते. १९६९ मध्ये या भागातील वनराईत वाघाचा संचार होता असेही सांगितले जाते. तलावात अंबरझरा, मन्यारखेडा व मोहाडीकडून पाणी येते. मात्र काही बांधकामांमुळे येणार्‍या प्रवाहात बदल होऊन पाण्याची आवकही गेल्या काही वर्षात घटली आहे. तलावाचे एकूण क्षेत्रफळ ७६ हेक्टर एवढे आहे. तर पाच किलो मीटरची पेरीफेरी आहे. तलावाची साठवण क्षमता ९१.८४ दलघफु एवढी असल्याची नोंद महापालिकेकडे आहे.
विकासाकडे दुर्लक्ष
मेहरूण तलाव परिसर एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसीत व्हावा यासाठी बर्‍याच वेळेस नियोजन झाले. विविध कामे या परिसरात प्रस्तावित आहेत. मात्र प्रत्यक्षात फारशी कामे या भागात होऊ शकलेली नाहीत. गणेशोत्सव, दुर्गोत्सव काळात तलावात मूर्त्यांचे विसर्जन करताना महापालिका, स्वयंसेवी संस्थांकडून विविध आवाहने केली जात असतात मात्र त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाहीत.
------