शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाची प्रतीक्षा कायम!

By admin | Updated: March 1, 2016 03:45 IST

यावर्षी स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प आणि त्यातील नव्या तरतुदी काय असतील याविषयी उत्सुक असलेल्या महिलांकडून निराशेची प्र्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे

यावर्षी स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प आणि त्यातील नव्या तरतुदी काय असतील याविषयी उत्सुक असलेल्या महिलांकडून निराशेची प्र्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. सुरुवातीला अर्थमंत्र्यांनी ज्या नऊ स्तंभांचा उल्लेख केला, त्यात महिलांचा कुठेही उल्लेखच नव्हता. १.५0 कोटी महिलांपर्यंत स्वयंपाकाचा गॅस पोहोचवणे आणि व्यवसाय प्रशिक्षणासाठी ५00 कोटींची दलित व मागासवर्गीयांबरोबर केलेली तरतूद वगळता कुठलीही तरतूद नाही.आजवरच्या अर्थसंकल्पांचा विचार करता असे वाटते की, स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प म्हणताना महिलांचे नेमके कल्याण कशामुळे होणार आहे, हेच आपल्याला स्पष्टपणे कळलेले नाही. महिलांसाठीचा खर्च समारंभ, शिवणयंत्र वाटप, दलित मुलींना आहार, महिलांसाठी प्रसाधनगृहे, प्रसूतीगृहे यापलीकडे जात नाहीच. स्त्रीचे सक्षमीकरण नेमके कशातून करायचे आहे? महिलांना समान वेतन किंवा मॅटर्निटी बेनिफिट्स मिळाले की स्त्री सक्षमीकरण झाले का? पूर्वापारपासून अन्नधान्य स्वस्त होणे, महागाई कमी होणे, गॅस-रॉकेलवरील सबसिडी वाढवणे, दागिने, कपडे, सौंदर्यप्रसाधने स्वस्त होणे म्हणजे महिलांना फायदा देणारा अर्थसंकल्प, असेच मानले जात होते. पण महागाई कमी होणे आणि मुलांचे कल्याण याच्याशी पुरुषांचा काहीच संबंध नाही, हे म्हणणे खरोखरच योग्य होईल का? आजही यात फारसा बदल झालेला दिसत नाही.खऱ्या अर्थाने स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प म्हणण्यासाठी मूलभूत संसाधनांवर स्त्रियांचा हक्क निर्माण व्हायला हवा. त्यांच्यासाठी विशेष शैक्षणिक व अर्थार्जनाच्या संधी अग्रहक्काने उपलब्ध व्हायला हव्यात. प्रत्येक अर्थसंकल्पात याकडे दुर्लक्ष होते. अर्थसंकल्पाचे स्त्रीकेंद्रित लेखापरीक्षणही महत्त्वाचे आहे, हे तर पार विस्मरणात गेल्यात जमा आहे.महिलांचे विश्व चूल आणि मूल यात मर्यादित करताना राष्ट्राच्या उत्पादकतेतील त्यांचा मोलाचा वाटा कायम नाकारला जातो. तिला गृहिणी म्हणून मानाचे स्थान आहे असे म्हणायचे तर दुसरीकडे तिच्या कामाला अनुत्पादक ठरवून सुमारे ४८ टक्के लोकसंख्या बेकार मानायची हे गणित कधीतरी बदलायची गरज नाही का? मूल वाढवणे, कुटुंब सांभाळणे हे स्त्रियांचे काम जर भारतीय संस्कृती व समाज अर्थार्जनाइतकेच महत्त्वाचे मानत असेल तर निव्वळ गृहिणींसाठी कुठल्याच सरकारने आजवर योजना का बरे केल्या नाहीत? स्त्रीविषयक धोरण, कायदे, सामाजिक सुधारणा आणि स्त्रीकेंद्रित अर्थविनियोग या सर्व गोष्टी जुळून आल्या तरच अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने स्त्रीकेंद्रित आहे असे म्हणता येईल. असा विचार केला तर या अर्थसंकल्पात महिलांना दिलासा देईल असे काहीही नाही, असेच म्हणावे लागेल.