शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाची प्रतीक्षा कायम!

By admin | Updated: March 1, 2016 03:45 IST

यावर्षी स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प आणि त्यातील नव्या तरतुदी काय असतील याविषयी उत्सुक असलेल्या महिलांकडून निराशेची प्र्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे

यावर्षी स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प आणि त्यातील नव्या तरतुदी काय असतील याविषयी उत्सुक असलेल्या महिलांकडून निराशेची प्र्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. सुरुवातीला अर्थमंत्र्यांनी ज्या नऊ स्तंभांचा उल्लेख केला, त्यात महिलांचा कुठेही उल्लेखच नव्हता. १.५0 कोटी महिलांपर्यंत स्वयंपाकाचा गॅस पोहोचवणे आणि व्यवसाय प्रशिक्षणासाठी ५00 कोटींची दलित व मागासवर्गीयांबरोबर केलेली तरतूद वगळता कुठलीही तरतूद नाही.आजवरच्या अर्थसंकल्पांचा विचार करता असे वाटते की, स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प म्हणताना महिलांचे नेमके कल्याण कशामुळे होणार आहे, हेच आपल्याला स्पष्टपणे कळलेले नाही. महिलांसाठीचा खर्च समारंभ, शिवणयंत्र वाटप, दलित मुलींना आहार, महिलांसाठी प्रसाधनगृहे, प्रसूतीगृहे यापलीकडे जात नाहीच. स्त्रीचे सक्षमीकरण नेमके कशातून करायचे आहे? महिलांना समान वेतन किंवा मॅटर्निटी बेनिफिट्स मिळाले की स्त्री सक्षमीकरण झाले का? पूर्वापारपासून अन्नधान्य स्वस्त होणे, महागाई कमी होणे, गॅस-रॉकेलवरील सबसिडी वाढवणे, दागिने, कपडे, सौंदर्यप्रसाधने स्वस्त होणे म्हणजे महिलांना फायदा देणारा अर्थसंकल्प, असेच मानले जात होते. पण महागाई कमी होणे आणि मुलांचे कल्याण याच्याशी पुरुषांचा काहीच संबंध नाही, हे म्हणणे खरोखरच योग्य होईल का? आजही यात फारसा बदल झालेला दिसत नाही.खऱ्या अर्थाने स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प म्हणण्यासाठी मूलभूत संसाधनांवर स्त्रियांचा हक्क निर्माण व्हायला हवा. त्यांच्यासाठी विशेष शैक्षणिक व अर्थार्जनाच्या संधी अग्रहक्काने उपलब्ध व्हायला हव्यात. प्रत्येक अर्थसंकल्पात याकडे दुर्लक्ष होते. अर्थसंकल्पाचे स्त्रीकेंद्रित लेखापरीक्षणही महत्त्वाचे आहे, हे तर पार विस्मरणात गेल्यात जमा आहे.महिलांचे विश्व चूल आणि मूल यात मर्यादित करताना राष्ट्राच्या उत्पादकतेतील त्यांचा मोलाचा वाटा कायम नाकारला जातो. तिला गृहिणी म्हणून मानाचे स्थान आहे असे म्हणायचे तर दुसरीकडे तिच्या कामाला अनुत्पादक ठरवून सुमारे ४८ टक्के लोकसंख्या बेकार मानायची हे गणित कधीतरी बदलायची गरज नाही का? मूल वाढवणे, कुटुंब सांभाळणे हे स्त्रियांचे काम जर भारतीय संस्कृती व समाज अर्थार्जनाइतकेच महत्त्वाचे मानत असेल तर निव्वळ गृहिणींसाठी कुठल्याच सरकारने आजवर योजना का बरे केल्या नाहीत? स्त्रीविषयक धोरण, कायदे, सामाजिक सुधारणा आणि स्त्रीकेंद्रित अर्थविनियोग या सर्व गोष्टी जुळून आल्या तरच अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने स्त्रीकेंद्रित आहे असे म्हणता येईल. असा विचार केला तर या अर्थसंकल्पात महिलांना दिलासा देईल असे काहीही नाही, असेच म्हणावे लागेल.