शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

१६ ग्रामपंचायतींचे मागितले फेरठराव १६३ कोटींची वाघूर सिंचन योजना : बंद पाईपांव्दारे पाणी पुरवठा

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे.

जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे.
वाघूर नदीच्या उपखोर्‍यातील वाघूर हा प्रकल्प वाघूर नदीवरच बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात एकूण ३२५ दलघमी पाणी साठा होऊ शकतो. या प्रकल्पातून सिंचनाचे नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी डावा कालवा व उजवा कालवा प्रस्तावित आहे. डाव्या कालव्याची लांबी १६.८५ किलो मीटरपर्यंत असून उजव्या कालव्याची लांबी २४ किलो मीटरपर्यंत आहे. यासाठी खरीप हंगाम, रब्बी हंगाम, उन्हाळी पिके यासाठी २३६.०७ दलघमी पाणी देणे प्रस्तावित आहे. जळगाव तालुक्यातील ५१ गावांमधील १४ हजार ९६० हेक्टरात या माध्यमातून पाणी मिळू शकते. उजव्या कालव्यावर काही भागात कालव्यांची कामेही झाली आहे.
१६ गावांचा विरोध
डाव्या कालव्यावरील जळगाव तालुक्यातील १६ गावांचा कालव्याने पाणी देण्यास व जमिनी देण्यास गेल्या पाच ते सहा वर्षापासून विरोध होत आहे. १६ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ठराव करून या योजनेस विरोध दर्शविण्यात आल्याने तापी पाटबंधारे महामंडळ हतबल झाल्यागत परिस्थिती होती. उच्च न्यालयापर्यंत याप्रश्नी ग्रामस्थांनी याचिका दाखल केल्या त्यामुळे या गावांच्या परिसरात बंदिस्त पाईप लाईनने पाणी देणे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या योजनेचा केंद्र शासनाच्या कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याने निधीची उपलब्धताही आहे.
---
या गावांचा होता विरोध
जळगाव तालुक्यातील नशिराबाद, कडगाव, भादली, जळगाव खुर्द, कानसवाडे, भोलाणे, सुजदे, नांद्रे, खापरखेडे, धामणगाव, तुरखेडे, विदगाव, आवार, विदगाव, डिकसाई, शेळगाव आदी गावांमधील ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये कालव्यांच्या कामांना विरोध दर्शवत आम्हाला कालव्यांची गरज नसल्याबाबत ठराव करून तापी पाटबंधारे महामंडळास पाठविले होते.