शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

१६ ग्रामपंचायतींचे मागितले फेरठराव १६३ कोटींची वाघूर सिंचन योजना : बंद पाईपांव्दारे पाणी पुरवठा

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे.

जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे.
वाघूर नदीच्या उपखोर्‍यातील वाघूर हा प्रकल्प वाघूर नदीवरच बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात एकूण ३२५ दलघमी पाणी साठा होऊ शकतो. या प्रकल्पातून सिंचनाचे नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी डावा कालवा व उजवा कालवा प्रस्तावित आहे. डाव्या कालव्याची लांबी १६.८५ किलो मीटरपर्यंत असून उजव्या कालव्याची लांबी २४ किलो मीटरपर्यंत आहे. यासाठी खरीप हंगाम, रब्बी हंगाम, उन्हाळी पिके यासाठी २३६.०७ दलघमी पाणी देणे प्रस्तावित आहे. जळगाव तालुक्यातील ५१ गावांमधील १४ हजार ९६० हेक्टरात या माध्यमातून पाणी मिळू शकते. उजव्या कालव्यावर काही भागात कालव्यांची कामेही झाली आहे.
१६ गावांचा विरोध
डाव्या कालव्यावरील जळगाव तालुक्यातील १६ गावांचा कालव्याने पाणी देण्यास व जमिनी देण्यास गेल्या पाच ते सहा वर्षापासून विरोध होत आहे. १६ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ठराव करून या योजनेस विरोध दर्शविण्यात आल्याने तापी पाटबंधारे महामंडळ हतबल झाल्यागत परिस्थिती होती. उच्च न्यालयापर्यंत याप्रश्नी ग्रामस्थांनी याचिका दाखल केल्या त्यामुळे या गावांच्या परिसरात बंदिस्त पाईप लाईनने पाणी देणे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या योजनेचा केंद्र शासनाच्या कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याने निधीची उपलब्धताही आहे.
---
या गावांचा होता विरोध
जळगाव तालुक्यातील नशिराबाद, कडगाव, भादली, जळगाव खुर्द, कानसवाडे, भोलाणे, सुजदे, नांद्रे, खापरखेडे, धामणगाव, तुरखेडे, विदगाव, आवार, विदगाव, डिकसाई, शेळगाव आदी गावांमधील ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये कालव्यांच्या कामांना विरोध दर्शवत आम्हाला कालव्यांची गरज नसल्याबाबत ठराव करून तापी पाटबंधारे महामंडळास पाठविले होते.