शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१६ ग्रामपंचायतींचे मागितले फेरठराव १६३ कोटींची वाघूर सिंचन योजना : बंद पाईपांव्दारे पाणी पुरवठा

By admin | Updated: August 1, 2016 23:57 IST

जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे.

जळगाव : वाघूर धरणावरून सिंचनासाठी पाईप लाईनने पाणी देण्याच्या योजनेचा केंद्र शासनाच्या पंतप्रधान सिंचन योजनेत समावेश झाला मात्र १६३ कोटींच्या या योजनेस विरोध दर्शविणारे ग्रामपंचायतींचे ठराव अथडथळा ठरत असून त्यापासून ग्रामस्थांचे मन वळविण्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत या गावांचे फेरठराव मिळावेत यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे प्रयत्न सुरू असून त्यासंदर्भातील भेटी गाठींनाही आता वेग आला आहे.
वाघूर नदीच्या उपखोर्‍यातील वाघूर हा प्रकल्प वाघूर नदीवरच बांधण्यात आला आहे. या प्रकल्पात एकूण ३२५ दलघमी पाणी साठा होऊ शकतो. या प्रकल्पातून सिंचनाचे नियोजनही करण्यात आले आहे. यासाठी डावा कालवा व उजवा कालवा प्रस्तावित आहे. डाव्या कालव्याची लांबी १६.८५ किलो मीटरपर्यंत असून उजव्या कालव्याची लांबी २४ किलो मीटरपर्यंत आहे. यासाठी खरीप हंगाम, रब्बी हंगाम, उन्हाळी पिके यासाठी २३६.०७ दलघमी पाणी देणे प्रस्तावित आहे. जळगाव तालुक्यातील ५१ गावांमधील १४ हजार ९६० हेक्टरात या माध्यमातून पाणी मिळू शकते. उजव्या कालव्यावर काही भागात कालव्यांची कामेही झाली आहे.
१६ गावांचा विरोध
डाव्या कालव्यावरील जळगाव तालुक्यातील १६ गावांचा कालव्याने पाणी देण्यास व जमिनी देण्यास गेल्या पाच ते सहा वर्षापासून विरोध होत आहे. १६ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत ठराव करून या योजनेस विरोध दर्शविण्यात आल्याने तापी पाटबंधारे महामंडळ हतबल झाल्यागत परिस्थिती होती. उच्च न्यालयापर्यंत याप्रश्नी ग्रामस्थांनी याचिका दाखल केल्या त्यामुळे या गावांच्या परिसरात बंदिस्त पाईप लाईनने पाणी देणे प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे या योजनेचा केंद्र शासनाच्या कृषी सिंचन योजनेत समावेश झाल्याने निधीची उपलब्धताही आहे.
---
या गावांचा होता विरोध
जळगाव तालुक्यातील नशिराबाद, कडगाव, भादली, जळगाव खुर्द, कानसवाडे, भोलाणे, सुजदे, नांद्रे, खापरखेडे, धामणगाव, तुरखेडे, विदगाव, आवार, विदगाव, डिकसाई, शेळगाव आदी गावांमधील ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये कालव्यांच्या कामांना विरोध दर्शवत आम्हाला कालव्यांची गरज नसल्याबाबत ठराव करून तापी पाटबंधारे महामंडळास पाठविले होते.