शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वाघूरने केली सत्तरी पार... मेहरूण तलाव ओव्हर फ्लोच्या मार्गावर : जळगावकरांसाठी भक्कम पाणी साठा, शेतीलाही पाणीच पाणी

By admin | Updated: September 26, 2016 00:35 IST

जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे.

जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे.
जिल्‘ात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस आहे. अपवाद होता तो जामनेर तालुक्याचा या तालुक्यात तसेच वाघूर नदीच्या उगमस्थळी समाधानकारक पाऊस नसल्याने वाघूरच्या मागील वर्षीच्या पाणी साठ्यात फारशी वाढ अशी नव्हतीच. गेल्या आठवड्यात या धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी ६१ टक्के होती. ६१ ठक्के साठा म्हणजे शहराच्या पाणी पुरवठ्याची दोन वर्षांची चिंता मिटली अशी परिस्थिती होती.
परतीच्या पावसाची कृपा
जळगाव शहर व तालुक्यात समाधानकारक पाऊस आहे. वाघूर प्रकल्प क्षेत्र तसेच जामनेर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६० ते ६५ टक्के पाऊस झाला होता. एकीकडे जिल्‘ातील बहुतांश तालुक्यात सरासरी पाऊस पडत असताना जामनेर तालुक्यात असे चित्र होते. परतीच्या पावसाने मात्र वाघूरच्या पाणलोट क्षेत्रावर कृपा केल्याचीच परस्थिती आहे.
पाणी साठ्यात झपाट्याने वाढ
जुलै महिन्यात वाघूर प्रकल्पात ५० टक्के पाणी साठा होता. तोनंतर हळू हळू वाढत जाऊन गेल्या आठवड्यात ६१ टक्क्यांवर आला. जामनेर तालुका तसेच वाघूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास संपूर्ण पावसाळ्यात फारसा पाऊस नसल्याने ६१ च्या जवळपासच साठा थांबेल असे चित्र असताना दोन दिवसातील परतीच्या पावसाने वाघूर व उपनद्यांना पुर आला असून त्याचे परिणाम वाघूर धरणाच्या पाणी साठ्यावर होत असल्याचे लक्षात येत आहे.
-----
अशी होती तीन वर्षातील स्थिती
गेल्या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस नव्हता. २०१३, २०१४ मध्ये धरणाच्या लाभ क्षेत्रात अतिशय चांगला पाऊस झाल्याने वाघूर धरण १०० टक्के भरले होते. परिणामी परिसरातील पिण्याच्या व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले होते. जिल्हयातील अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये मोडणार्‍या या प्रकल्पावरून जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी वाघूरच्या पाण्याचा उपयोग होत असतो. २०१५ मध्ये पावसाचे प्रमाण अतिशय नगण्य होते मात्र शिल्लक साठ्यामुळे पाण्याची अडचणी निर्माण होऊ शकली नाही. २०१२ मध्ये कमी पावसामुळे धरणात शुन्य टक्के साठा झाला होता.
-----
साठा पोहोचला ७२ टक्क्यांवर
अजिंठ्या नजीक लेण्यांच्या परिसरातील पर्वत रांगांमधून वाघूर नदीचे उगमस्थान आहे. या परिसरात चांगला पाऊस सुरू असून पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७२ टक्के पाणी साठा झाला आहे. या साठ्यामुळे जळगाव शहरास तीन वर्षे पुरेल एवढा पाणी साठा धरणात उपलब्ध असून जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा रब्बीचे क्षेत्रही यंदा वाढणार असल्याचे चित्र वाघूरच्या पाणी साठ्यामुळे निर्माण झाले आहे