शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

वाघूरने केली सत्तरी पार... मेहरूण तलाव ओव्हर फ्लोच्या मार्गावर : जळगावकरांसाठी भक्कम पाणी साठा, शेतीलाही पाणीच पाणी

By admin | Updated: September 26, 2016 00:35 IST

जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे.

जळगाव : परतीचा पाऊस जळगावकरांसाठी सुखद ठरत असून शहरास पाणी पुरवठा होत असलेल्या वाघूर धरणात पाणी साठा गेल्या दोन दिवसांपासून सातत्त्याने वाढतो आहे. या धरणाने आता सत्तरी पार केल्याने जवळपास तीन वर्षांचा पाणी साठा आता उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. धरणात आता जवळपास ७२ टक्के पाणी साठा झाला आहे.
जिल्‘ात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस आहे. अपवाद होता तो जामनेर तालुक्याचा या तालुक्यात तसेच वाघूर नदीच्या उगमस्थळी समाधानकारक पाऊस नसल्याने वाघूरच्या मागील वर्षीच्या पाणी साठ्यात फारशी वाढ अशी नव्हतीच. गेल्या आठवड्यात या धरणाच्या उपयुक्त पाणी साठ्याची टक्केवारी ६१ टक्के होती. ६१ ठक्के साठा म्हणजे शहराच्या पाणी पुरवठ्याची दोन वर्षांची चिंता मिटली अशी परिस्थिती होती.
परतीच्या पावसाची कृपा
जळगाव शहर व तालुक्यात समाधानकारक पाऊस आहे. वाघूर प्रकल्प क्षेत्र तसेच जामनेर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ६० ते ६५ टक्के पाऊस झाला होता. एकीकडे जिल्‘ातील बहुतांश तालुक्यात सरासरी पाऊस पडत असताना जामनेर तालुक्यात असे चित्र होते. परतीच्या पावसाने मात्र वाघूरच्या पाणलोट क्षेत्रावर कृपा केल्याचीच परस्थिती आहे.
पाणी साठ्यात झपाट्याने वाढ
जुलै महिन्यात वाघूर प्रकल्पात ५० टक्के पाणी साठा होता. तोनंतर हळू हळू वाढत जाऊन गेल्या आठवड्यात ६१ टक्क्यांवर आला. जामनेर तालुका तसेच वाघूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जवळपास संपूर्ण पावसाळ्यात फारसा पाऊस नसल्याने ६१ च्या जवळपासच साठा थांबेल असे चित्र असताना दोन दिवसातील परतीच्या पावसाने वाघूर व उपनद्यांना पुर आला असून त्याचे परिणाम वाघूर धरणाच्या पाणी साठ्यावर होत असल्याचे लक्षात येत आहे.
-----
अशी होती तीन वर्षातील स्थिती
गेल्या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस नव्हता. २०१३, २०१४ मध्ये धरणाच्या लाभ क्षेत्रात अतिशय चांगला पाऊस झाल्याने वाघूर धरण १०० टक्के भरले होते. परिणामी परिसरातील पिण्याच्या व शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले होते. जिल्हयातील अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये मोडणार्‍या या प्रकल्पावरून जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्यातील काही गावांना सिंचनासाठी वाघूरच्या पाण्याचा उपयोग होत असतो. २०१५ मध्ये पावसाचे प्रमाण अतिशय नगण्य होते मात्र शिल्लक साठ्यामुळे पाण्याची अडचणी निर्माण होऊ शकली नाही. २०१२ मध्ये कमी पावसामुळे धरणात शुन्य टक्के साठा झाला होता.
-----
साठा पोहोचला ७२ टक्क्यांवर
अजिंठ्या नजीक लेण्यांच्या परिसरातील पर्वत रांगांमधून वाघूर नदीचे उगमस्थान आहे. या परिसरात चांगला पाऊस सुरू असून पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ७२ टक्के पाणी साठा झाला आहे. या साठ्यामुळे जळगाव शहरास तीन वर्षे पुरेल एवढा पाणी साठा धरणात उपलब्ध असून जवळपास २५ हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. याचा फायदा रब्बीचे क्षेत्रही यंदा वाढणार असल्याचे चित्र वाघूरच्या पाणी साठ्यामुळे निर्माण झाले आहे