शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
5
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
6
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
7
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
8
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
9
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
10
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
11
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
12
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
13
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
14
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
15
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
16
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
17
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
18
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
19
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
20
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या

वाघूरचे पाणी मिळूनही नशिराबाद तहानलेलेच!

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

नशिराबाद- येथे कायमस्वरुपी पाणी पयोजनाच कार्यान्वित नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळाले असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण कायम आहे. पाणी समस्येचा तिढा कायमच असल्याने सध्या दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. वाघूरचे पाणी मिळूनही टंचाईची तीव्रता कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. पाण्याचा ठणठणाटामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

नशिराबाद- येथे कायमस्वरुपी पाणी पयोजनाच कार्यान्वित नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळाले असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण कायम आहे. पाणी समस्येचा तिढा कायमच असल्याने सध्या दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. वाघूरचे पाणी मिळूनही टंचाईची तीव्रता कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. पाण्याचा ठणठणाटामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
गेल्या २५ वर्षापासून टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. कायमस्वरुपी पाणी योजनाच अद्यापपर्यंत कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहे. कोट्यावधीच्या थकबाकीमुळे एमआयडीसी पाणी देण्यास तयार नाही. त्यासाठी मंत्रालयात धाव घेण्यात आली मात्र अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्याचे भिजत घोंगडे कायम आहे.
दरम्यान तीव्र पाणी टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळावे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यास जिल्हाधिकारी यांनी सहमती देवून २० द.ल.घ.फुट पाणी सोडण्यास मंजुरी दिली. त्यानुसार १८ फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून सीआर गेट ९ मधून पाणी बेळी येथे नशिराबाद पाणीपुरवठा केंद्राजवळ बंधार्‍यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतीने बंधारा बांधला. जलपुजनाचा कार्यक्रम झाला. आता पाणी समस्या सुटली असा दिलासा देत ५ व्या दिवशी पाणी मिळेल असे सांगण्यात आले. जादा अश्वशक्तीचे विद्युत पंप बसविण्यात आले. मात्र विजेच्या कमी अधिक प्रवाहामुळे सदर पंप जळाला. त्यामुळे टंचाईची तीव्रता कायमच राहिली. त्यात दुसरा पंप नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण कायमच आहे. १.४ द.ल.घ.फु. पाणी वाघूर धरणातून मिळाले असल्याचे सांगण्यात आले. आता दुसरे आवर्तन सुटावे, याबाबत पाऊले उचलली जात आहे. मात्र बंधाराचे कामाचा दर्जा सुधारावा त्यामुळे पाणीचे साठवण उत्तम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाघूरचे पाणी मिळूनही नियोजनाअभावी पाण्याचा ठणठणाट आहे, पाणी द्या -पाणी अशी आर्त हाक नागरिक देत आहे. ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तात्काळ उपाययोजना करुन ग्रामस्थांचे हाल थांबवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाणी समस्या सोडविण्याबाबत आता चर्चा नको, तर तात्काळ उपाययोजना व्हावी, अशी मागणी होत आहे.