शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

वाघूरचे पाणी मिळूनही नशिराबाद तहानलेलेच!

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

नशिराबाद- येथे कायमस्वरुपी पाणी पयोजनाच कार्यान्वित नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळाले असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण कायम आहे. पाणी समस्येचा तिढा कायमच असल्याने सध्या दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. वाघूरचे पाणी मिळूनही टंचाईची तीव्रता कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. पाण्याचा ठणठणाटामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.

नशिराबाद- येथे कायमस्वरुपी पाणी पयोजनाच कार्यान्वित नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळाले असूनही ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण कायम आहे. पाणी समस्येचा तिढा कायमच असल्याने सध्या दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. वाघूरचे पाणी मिळूनही टंचाईची तीव्रता कायमच असल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहे. पाण्याचा ठणठणाटामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे.
गेल्या २५ वर्षापासून टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. कायमस्वरुपी पाणी योजनाच अद्यापपर्यंत कार्यान्वित नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहे. कोट्यावधीच्या थकबाकीमुळे एमआयडीसी पाणी देण्यास तयार नाही. त्यासाठी मंत्रालयात धाव घेण्यात आली मात्र अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्याचे भिजत घोंगडे कायम आहे.
दरम्यान तीव्र पाणी टंचाई निवारणार्थ वाघूर धरणातून पाणी मिळावे अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यास जिल्हाधिकारी यांनी सहमती देवून २० द.ल.घ.फुट पाणी सोडण्यास मंजुरी दिली. त्यानुसार १८ फेब्रुवारीला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. वाघूर धरणाच्या डाव्या कालव्यातून सीआर गेट ९ मधून पाणी बेळी येथे नशिराबाद पाणीपुरवठा केंद्राजवळ बंधार्‍यात आले. त्यासाठी ग्रामपंचायतीने बंधारा बांधला. जलपुजनाचा कार्यक्रम झाला. आता पाणी समस्या सुटली असा दिलासा देत ५ व्या दिवशी पाणी मिळेल असे सांगण्यात आले. जादा अश्वशक्तीचे विद्युत पंप बसविण्यात आले. मात्र विजेच्या कमी अधिक प्रवाहामुळे सदर पंप जळाला. त्यामुळे टंचाईची तीव्रता कायमच राहिली. त्यात दुसरा पंप नादुरुस्त झाल्याने पाणी पुरवठा व्यवस्था कोलमडली आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण कायमच आहे. १.४ द.ल.घ.फु. पाणी वाघूर धरणातून मिळाले असल्याचे सांगण्यात आले. आता दुसरे आवर्तन सुटावे, याबाबत पाऊले उचलली जात आहे. मात्र बंधाराचे कामाचा दर्जा सुधारावा त्यामुळे पाणीचे साठवण उत्तम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाघूरचे पाणी मिळूनही नियोजनाअभावी पाण्याचा ठणठणाट आहे, पाणी द्या -पाणी अशी आर्त हाक नागरिक देत आहे. ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तात्काळ उपाययोजना करुन ग्रामस्थांचे हाल थांबवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाणी समस्या सोडविण्याबाबत आता चर्चा नको, तर तात्काळ उपाययोजना व्हावी, अशी मागणी होत आहे.