शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

उपराष्ट्रपतिपद : भाजपाचे नायडू की विद्यासागर राव?

By admin | Updated: July 7, 2017 01:42 IST

उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष दिल्लीत ११ जुलै रोजी एकत्र येत आहेत

हरीश गुप्ता/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उमेदवार कोण असेल यावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष दिल्लीत ११ जुलै रोजी एकत्र येत आहेत तर याचसाठी भाजपा नेत्यांची बैठक १५-१६ जुलै रोजी होईल. भाजपातर्फे एम. व्यंकया नायडू व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची नावे चर्चेत आहेत.या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस १८ जुलै असल्यामुळे भाजपा निवांतपणे काम करीत आहे. भाजपामधील उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा उमेदवार दक्षिण वा ईशान्य भारतातून देण्याच्या विचारात आहे. उमेदवाराला पुरेसा संसदीय अनुभव असावा व त्याला राज्यसभेत बेबंद सदस्यांना शिस्तीत राखता आले पाहिजे, अशी भाजपाची भूमिका आहे. सध्या २४३ सदस्यांच्या राज्यसभेत भाजपाला मित्रपक्ष व नामनियुक्तांसह ९० खासदारांचा पाठिंबा आहे. पुढील दोन वर्षे भाजपासाठी खूपच महत्त्वाची आहेत. विरोधक एकत्र येत असताना राज्यसभेचे सभापती असलेले हे पद दुबळे व अनुभव नसलेले चालणार नाही. त्यामुळे व्यंकय्या नायडू हे चर्चेत आहेत. भाजपाचे ते जुने निष्ठावंत व मोदीभक्त आहेत. गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर जायला सांगण्याची त्यांची क्षमता आहे.