नवी दिल्ली : इंटरनेटच्या माध्यमातून मतदान सुरू करण्याची कुठलीही योजना नसल्याचे कायदा मंत्री डी़व्ही़ सदानंद गौडा यांनी गुरुवारी लोकसभेत स्पष्ट केले असतानाच, भविष्यात ई-मतदान शक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे़ विशेष म्हणजे या दिशेने पहिले पाऊल टाकत मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी आयोगाने कंबर कसली आहे़मुख्य निवडणूक आयुक्त एच़एम़ ब्रह्मा यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली़ इंटरनेटच्या माध्यमातून मतदान शक्य आहे आणि या दिशेने पहिले पाऊल टाकत मतदार याद्या पूर्णत: त्रुटीमुक्त करण्याचे काम आम्ही हाती घेत आहोत, असे ब्रह्मा यांनी यावेळी सांगितले़ अर्थात यासाठीची कालमर्यादा सांगण्यास त्यांनी नकार दिला़ई-मतदानाने देशाचा प्रचंड ऊर्जा, संसाधन आणि वेळ वाचवता येऊ शकतो, असे युवा मतदारांचे मत आहे़ दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी रांगेत उभा असताना मी स्वत:चा याचा अनुभव घेतला असल्याचे त्यांनी सांगितले़ आयोग येत्या ३ मार्च ते १५ आॅगस्टदरम्यान राष्ट्रीय मतदार यादी दुरुस्ती व सत्यापन कार्यक्रम राबवणार आहे़