शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रांवर खापर

By admin | Updated: March 16, 2017 00:34 IST

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे

लखनऊ/ नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर मतदान यंत्रांवर फोडले व या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड केल्याचा आरोप केला.लखनऊमध्ये पत्रकारांना मायावती म्हणाल्या की, भाजपाला मिळालेले यश हे ‘अप्रामाणिकपणा’ आणि ‘लबाडी’ने मिळाले आहे.भाजपाने मतदान यंत्रांमध्ये गडबड केल्याने प्रत्यक्षात आमच्या बाजूने पडलेली मते मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे वळविली गेली. मणिपूर व गोवा यासारख्या छोट्या राज्यांमध्येही गडबड केली असती तर बिंग फुटले असते. शिवाय उत्तर प्रदेशमध्ये जे केले त्याला उत्तर द्यायला जागा राहावी म्हणून भाजपाने इतर राज्यांमध्ये अशी लबाडी ेकली नाही, असा त्यांनी आरोप केला. मायावती म्हणाल्या की. मतमोजणी सुरू असातनाच आम्ही हा विषय निवडणूक आयोगाकडे नेला. पण आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता याविरुद्ध न्यायालयातही दाद मागितली जाईल. लोकशाहीचा हा खून ११ तारखेला झालेला असल्याने बसपा प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला ‘काळ दिवस’ पाळेल आणि त्या दिवशी निषेध धरणे धरले जाईल. मावळत्या विधनसभेत ८०आमदार असलेल्या बसपाचे नव्या विधानसभेत फक्त १९ सदस्य निवडून आले आहेत.पराभवाने मानसिक संतुलन बिघडल्याने केजरीवाल अशी बडबड करत आहेत. पंजाबच्या मतदारांनी नाकारले हे त्यांनी मान्य करावे. दिल्लीत ७० पैकी ६७ जागा ‘आप’ला मिळाल्या तेव्हा केजरीवाल यांनी अशी तक्रार केली नव्हती. आरोप करण्याऐवजी केजरीवाल यांनी ‘विपस्यना’ करावी आणि दिल्लीच्या राज्य कारभाराकडे अधिक लक्ष द्यावे. - हरसिमरन कौर बादल, केंद्रीय मंत्री व अकाली दल नेत्याप्रत्येत राजकीय पक्ष पराभव झाल्यावर अशी तक्रार करत असतो व जिंकल्यावर तो गप्प बसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी नव्हे तर मतदारांच्या मनात कोणताही किंतू राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने सक्रियतेने व आक्रमकतेने मतदान यंत्रांविषयीच्या शंका-कुशंकांचे ठामपणे निरसन करायला हवे. शिवाय २०१९ च्या निवडणुकीत् मतदारांना मतदानाची लेखी पोचपावती देण्याचे वचन आयोगाने सर्वोच्च न्यायालयास दिले आहे. त्यासाठीही तयारी करावी.- एस. वाय. कुरेशी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त