शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
3
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
4
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
5
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
6
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
8
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
9
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार
10
Ritual: स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये असे म्हणतात; पण का? जाणून घ्या शास्त्रार्थ!
11
जुन्या घरात सापडला सांगाडा, नोकियाच्या फोनने असं उघड केलं १० वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूचं गुपित, पोलिसही अवाक्
12
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१५,११४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
13
Manglagauri 2025: यंदा मंगळागौर कधी? ही घ्या तारखांची यादी, 'अशी' करा सुंदर तयारी लवकर..
14
५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक
15
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
16
भाजप प्रवेशाचा मार्ग झाला मोकळा; ठाकरेंच्या शिवसेनेचे बागुल, राजवाडे प्रकरणात नवा 'द्विस्ट'
17
बापरे! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी दागिने विकले, गहाण ठेवली शेती; ICUमध्ये मृत मुलावर उपचार
18
भारत-रशिया-चीन त्रिकुट..; पुतिन यांचे स्वप्न अमेरिका अन् डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणार
19
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
20
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार

मतदान यंत्रांवर खापर

By admin | Updated: March 16, 2017 00:34 IST

बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे

लखनऊ/ नवी दिल्ली : बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षांच्या अनुक्रमे उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर मतदान यंत्रांवर फोडले व या दोन्ही राज्यांत भारतीय जनता पार्टीने मतदान यंत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गडबड केल्याचा आरोप केला.लखनऊमध्ये पत्रकारांना मायावती म्हणाल्या की, भाजपाला मिळालेले यश हे ‘अप्रामाणिकपणा’ आणि ‘लबाडी’ने मिळाले आहे.भाजपाने मतदान यंत्रांमध्ये गडबड केल्याने प्रत्यक्षात आमच्या बाजूने पडलेली मते मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडे वळविली गेली. मणिपूर व गोवा यासारख्या छोट्या राज्यांमध्येही गडबड केली असती तर बिंग फुटले असते. शिवाय उत्तर प्रदेशमध्ये जे केले त्याला उत्तर द्यायला जागा राहावी म्हणून भाजपाने इतर राज्यांमध्ये अशी लबाडी ेकली नाही, असा त्यांनी आरोप केला. मायावती म्हणाल्या की. मतमोजणी सुरू असातनाच आम्ही हा विषय निवडणूक आयोगाकडे नेला. पण आयोगाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता याविरुद्ध न्यायालयातही दाद मागितली जाईल. लोकशाहीचा हा खून ११ तारखेला झालेला असल्याने बसपा प्रत्येक महिन्याच्या ११ तारखेला ‘काळ दिवस’ पाळेल आणि त्या दिवशी निषेध धरणे धरले जाईल. मावळत्या विधनसभेत ८०आमदार असलेल्या बसपाचे नव्या विधानसभेत फक्त १९ सदस्य निवडून आले आहेत.पराभवाने मानसिक संतुलन बिघडल्याने केजरीवाल अशी बडबड करत आहेत. पंजाबच्या मतदारांनी नाकारले हे त्यांनी मान्य करावे. दिल्लीत ७० पैकी ६७ जागा ‘आप’ला मिळाल्या तेव्हा केजरीवाल यांनी अशी तक्रार केली नव्हती. आरोप करण्याऐवजी केजरीवाल यांनी ‘विपस्यना’ करावी आणि दिल्लीच्या राज्य कारभाराकडे अधिक लक्ष द्यावे. - हरसिमरन कौर बादल, केंद्रीय मंत्री व अकाली दल नेत्याप्रत्येत राजकीय पक्ष पराभव झाल्यावर अशी तक्रार करत असतो व जिंकल्यावर तो गप्प बसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी नव्हे तर मतदारांच्या मनात कोणताही किंतू राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने सक्रियतेने व आक्रमकतेने मतदान यंत्रांविषयीच्या शंका-कुशंकांचे ठामपणे निरसन करायला हवे. शिवाय २०१९ च्या निवडणुकीत् मतदारांना मतदानाची लेखी पोचपावती देण्याचे वचन आयोगाने सर्वोच्च न्यायालयास दिले आहे. त्यासाठीही तयारी करावी.- एस. वाय. कुरेशी, माजी मुख्य निवडणूक आयुक्त